फुरसुंगी : रखडलेली पेय जल योजना महाराष्ट्र प्राधिकरण विभागाकडून पूर्ण व्हावी यासाठी उरुळी देवाचिमधील राहिवाशी राजेश धालपे यांनी २४ सेकंदाच्या क्लीप द्वारे नागरिकांची व्यथा मांडली आहे. चार वर्षांपासून चालू असलेली ही योजना पूर्णत्वाचे नाव घेईना. साठवणूक टाकीचे काम पूर्ण होऊन वाहिनीचे काम अर्धवट असल्याने मोकळ्या टाक्या केवळ आशा दाखवत आहेत. मृगजळा मागे धावणाऱ्या हरणांप्रमाणे येथील नागरिकांची अवस्था झाली आहे.या
साठी प्रशासनाला जागे करण्यासाठी ही क्लीप केली असल्याचे त्यांनी सांगितले.या क्लीप मधून मोकळ्या टाकीचे, जलवाहिसाठी आणलेल्या परंतु अस्ताव्यस्त पडलेले पाईप,पाण्याचे टॅंकर याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.एवढ्या वेळेत आयफेल टॉवर तीन वेळेस बांधून झाला असता असा प्रशाषणाला मार्मिक टोला देखील लावण्यात आला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.