सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी : शरद पवार

सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी : शरद पवार

पुणे : राज्यात पावसामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, रायगड, पालघर या जिल्ह्यातील लोकांची गंभीर स्थिती आहे. या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच सर्वांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी, असेही ते म्हणाले.

पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहेत. ते म्हणाले, पिकांच्या उंचीपेक्षा अधिक पाणी साचले आहे. द्राक्ष आणि डाळिंबाला फटका बसला. शेती आणि जमिनीवरची माती वाहून गेल्यामुळे दीर्घकालीन नुकसान झाले आहे. हे जिल्हा दूध संकलन आणि पुरवण्याचे मुख्य केंद्र आहे. त्यालाही धक्का बसला आहे. पुराने जे नुकसान झाले ते पाहता अशी परिस्थिती कधीच नव्हती. या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठं नुकसान झाले. कोल्हापूर, सांगली हा भाग ग्रस्त झाला आहे. पिकांचे नुकसान, जनावरं, व्यक्तिगत नुकसान होत आहे. गावही उद्ध्वस्त झाले. 

तसेच ते पुढे म्हणाले, पाणी ओसरताच राज्य सरकारने पंचनामे करून मदत करावी. नुकसानीचे प्रमाण पाहता या भागांत पूर्णपणे कर्जमाफी करावी. प्रचंड अडचणी निर्माण झाल्या असूनही, प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. उणीदुणी काढण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांना मदत करावी.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 लाख

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाच्या वतीने 50 लाख रूपये देणार आहोत. शिवाय, लोकांना औषधे पुरविणयात येणार आहे. पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शिबिर घेतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com