पुणे - लाँड्री व्यावसायिकांना वीजदरात ४० टक्के सवलत देण्याच्या निर्णयामुळे राज्यातील ४० हजार लाँड्री व्यावसायिकांना फायदा होणार आहे. लाँड्री व्यावसायिकांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला तर आणखी २५ टक्के सवलत देण्याचा अध्यादेशही लवकर काढला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.
लाँड्री व्यावसायिकांना वीजदरात सवलत जाहीर केल्याबद्दल पुणे जिल्हा लाँड्री व्यावसायिकांतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा पालकमंत्री गिरीश बापट आणि संघटनेचेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश नाशिककर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक, महाराष्ट्र परीट धोबी महासंघाचे अध्यक्ष देवराज सोनटक्के, अनिल शिंदे, प्रकाश अभ्यंकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा
राज्यातील सर्व कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर स्वस्त व शाश्वत वीज मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. महाऊर्जा मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
केवळ सहा टक्के भारनियमन
राज्यात केवळ सहा टक्केच भारनियमन सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘वीजबिलाची वसुली तीस टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशाच भागांत भारनियमन करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.