शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर ठोस पावले उचलावीत

Drought
Drought

पुणे - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दुष्काळ आणि शेतकरी यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यातील या संभाव्य संकटावर मात शेतकऱ्यांमधील अस्वस्थता कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने आतापासूनच ठोस पावले टाकली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. 

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि जालना जिल्ह्यातील जालना, अंबड व घनसौंघे या पाच तालुक्‍यांमध्ये गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे अभ्यास करण्यात आला. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. एच. एम. देसरडा आणि गोखले संस्थेतील  डॉ. नरेश बोडखे यांनी या अंतर्गत सुमारे चारशे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घेतली. डॉ. बोडखे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या दृष्टीने यंदाचा दुष्काळ जास्त गंभीर आहे. कारण, गेल्या चार ते पाच वर्षांपासून मालाला भावच मिळालेला नाही. आता शेतकऱ्यांच्या पिकाला तर सोडा, पण पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष्य आहे.’’ 

देशामधील निम्मी धरणे महाराष्ट्रात असूनही सिंचन क्षेत्र वाढवू शकत नाही. त्याची गुणवत्ता वाढवू शकत नाही. त्यामुळे यावर काम होणे गरजेचे आहे, असे  प्रा. जगदीश जाधव यांनी सांगितले. 

दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात, कारण, दुष्काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होते. त्याच्या पुढच्या वर्षी तो पेरणी करताना त्याचे आर्थिक गणित कोलमडलेले असते. त्यामुळे आत्महत्या वाढण्याचा धोका आता निर्माण झाला आहे, असे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे प्रा. डॉ. नरेश बोडखे यांनी सांगितले.

‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’ने २०१५ पासूनची माहिती प्रसिद्ध केलेली नाही. तरीही १९९५ पासून २०१५ पर्यंत तीन लाख १० हजार शेतकऱ्यांनी देशभरात आत्महत्या केल्या आहेत, अशी आकडेवारी सरकारने जाहीर केली असली, तरीही प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षाही मोठा आहे. यात एकट्या महाराष्ट्रात ६५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतातील ६० टक्के शेतीची कामे महिला करतात, तरीही महिलांना आपण शेतकरी मानत नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्या यात येत नाहीत. अशा स्थितीत पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
- पी. साईनाथ

सहा वर्षांपूर्वीपेक्षा हा दुष्काळ का वेगळा आहे?
  महाराष्ट्रात २०१२ मध्ये शेतमालाला किमान भाव मिळाला होता. यंदा भाव नाही
  त्या वेळी जमिनीत पाणी होते. आता भूजल पाणीसाठा रिता आहे. 
  विंधन विहिरीतील पाण्यावर पशुधनासाठी चारा घेतला होता.  यंदा चारा नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com