पुणे नाशिक रेल्वेला शेतकऱ्यांचा विरोध

wagholi
wagholi

वाघोली - पुणे नाशिक प्रस्तावित हाय स्पीड रेल्वेला आज केसनंद, बकोरी, वाडेबोलाई, मांजरी, लोणीकंद, कोलवडी येथील बाधित शेतकऱ्यांनी विरोध केला. सगळे प्रकल्प आमच्या कडेच का ? आमच्याच जमिनी द्यायच्या का ? असा प्रश्न उपस्तीत करून हा रेल्वे प्रकल्प होऊ देणार नाही. असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केसनंद येथे करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हा प्रकल्प भोसरीतून न्यावा असे मतही व्यक्त करण्यात आले. बैठकीपूर्वी अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया 
"रिंग रोड, कचरा प्रकल्प, रेल्वे आमच्या कडेच त्याचा आम्हाला काही फायदा नाही. यामुळे शेतकरी भूमिहीन होतील.एकत्रितपणे विरोध करणार "
- दीपक केसवड, सरपंच, वाडेबोलाई  

"फायद्या पेक्षा तोटाच जास्त. 80 टक्के लोक अल्पभूधारक आहेत. या जमिनी गेल्यानंतर त्यांना गाव सोडावे लागेल. हा प्रकल्प पूर्व हवेलीतून होता काम नये."  
- शंकर वाबळे, शेतकरी

" 600 ते 700 फूट जमीन गेली तर जमीनच राहणार नाही.  खासदारांना विरोध करण्याची गरज आहे. रेल्वे याच भागातून का हे विचारले पाहिजे." 
- चंद्रकांत वारघडे, माहिती अधिकार कार्यकर्ते

राखून ठेवलेल्या जमिनी देणार नाही. सेझ घालवला तसा रेल्वेला विरोध करू. रेल्वे भोसरी मार्गे न्हयावी. रेल्वे आमच्या गावातून जाऊ देणार नाही." 
- मिलिंद हरगुडे, माजी सरपंच, केसनंद

" रेल्वे मुळे फायदा काही नाही. जे काही होणार ते नुकसान होणार. रस्ता राहणार नाही. मनसे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून तीव्र विरोध करेल. "
- संदीप सातव, अध्यक्ष, मनसे, पुणे जिल्हा.

हिंजवडी सारख्या प्रकल्पात बाधित झालेले शेतकरी अजून वन वन भटकत आहेत. यामुळे वाड्या वस्त्या उठतील. नगर महामार्गाची वाहतुक कोंडी साधी खासदारांना सोडविता आली नाही." 
- कुशाबा गावडे, माजी सरपंच, वाडेबोलाई

विरोध का --
1) अनेकांच्या जमिनी जाणार. गाव सोडण्याची वेळ येईल.
2)  अनेक वाड्या, वस्त्या उठतील.
3) रेल्वेचा या गावाना फायदा नाही.
4) गावाचे दोन भागात तुकडे होतील. 
5) रिंग रोड, कचरा प्रकल्प, रेल्वे सगळ्यांसाठी आम्हीच जमिनी द्यायच्या का ? 
6) हा प्रस्तावित मार्ग याच भागातून का ? भोसरी वरून का नाही ? 

आंदोलनाची पुढील दिशा
1) 15 दिवसात हा प्रकल्प या भागातून रद्द केला नाही तर पुणे नगर महामार्ग रोखून धरणार.
 2) लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार.

सचीन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर केसनंदच्या सरपंच अलका हरगुडे यांनी आभार मानले. या प्रसंगी पप्पू कुटे, कृष्णा कोलते, युवराज ढोरे उपस्तीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com