शेतकऱ्यांचे ‘आयएमडी’ला टाळे

शेतकऱ्यांचे ‘आयएमडी’ला टाळे

पुणे - हवामान विभागाकडून मॉन्सूनबाबत वर्तविण्यात आलेल्या चुकीच्या अंदाजामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याचा आरोप करीत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुण्यातील हवामान विभागाच्या कार्यालयाला  सोमवारी टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले.

माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हवामान विभागासमोर करपलेल्या पिकांसह ठिय्या आंदोलन करण्यात आले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. हवामान खाते हे बियाणे उद्योग आणि विमा कंपन्यांशी संगनमत करून चुकीचे अंदाज देऊन, शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांनी केला. चुकीच्या अंदाजामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाकडून खत कंपन्या, बियाण्यांचे धंदे चालण्यासाठी भरपूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्‍त केला जातो. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊसच पडत नाही. यामध्ये पिकांचे नुकसान होते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांचे आरोप 
 मॉन्सूनच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतीचे नुकसान
 अंदाजानुसार पाऊस पडत नाही
 बियाणे आणि विमा कंपन्यांशी संगनमत
 चुकीच्या पंचनाम्यामुळे पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत
 हवामान खाते बंद करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com