उजनी धरणातील मासे खातात ‘भाव’

Ujani-Dam
Ujani-Dam

भिगवण - उजनी धरणातील पाण्याचे प्रदूषण, बदललेले हवामान व यंदा धरणामध्ये असलेला विक्रमी पाणीसाठा, यामुळे उजनी धरणामध्ये मच्छीमारांना मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मासळी बाजारामधील आवक कमी झाली आहे. गारठ्यामुळे खवय्यांकडून मागणी कायम असल्यामुळे भावामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

मासळी बाजारांमध्ये उजनी धरणाबरोबरच तलावातील मासेही मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. बाजारांमध्ये विक्रीस येणाऱ्या चिलापी माशांची आवकही चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे चिलापी माशांचे भाव हे ६० रुपयांवरून थेट दुपटीपेक्षा अधिक १३० ते १६० रुपयांपर्यंत वधारले आहेत. शिंगटा, रहू, गुगळी, मिरगळ कटला, वाम, मरळ याही माशांच्या भावांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘पुढील महिन्यात पाणीसाठा कमी झाल्यानंतर व वडाप सुरू झाल्यानंतर आवक वाढेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com