

पुणे - सीमेवर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लष्करामध्ये १७ वर्षे देशसेवा बजावल्यानंतर कोणीही आनंदात उर्वरित जीवन व्यतीत केले असते. मात्र, खानापूर (ता. हवेली) येथील सचिन शिवाजी वाघ यांना देशसेवा स्वस्त बसू देत नव्हती. यामुळे त्यांनी जिद्द चिकाटीच्या जोरावर पोलिस दलाची परीक्षा दिली. त्यात घवघवीत यश मिळवून महाराष्ट्र पोलिस दलात सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले.