दोन-तीन दिवस कचरागाडी येत नाही...

Garbage-Vehicle
Garbage-Vehicle

वारजे माळवाडी - येथील महामार्ग उड्डाण पुलालगतच्या अक्षय पॅलेस या सोसायटीत दररोज महापालिकेची कचरा संकलनाची गाडी येत नाही. त्यामुळे कचरा साठवून ठेवावा लागत असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी केली आहे. 

याबाबत सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पोकळे, सचिव संतोष किबे यांनी सांगितले की, आमच्या सोसायटीत दररोज घंटागाडी येत नाही. त्यामुळे दोन ते तीन दिवस कचरा साठवून ठेवावा लागतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गाडी न आल्यास नगरसेवकांना फोन करावा लागतो. त्यानंतर सोसायटीत गाडी येते. आमच्या सोसायटीत ९५ फ्लॅट आहेत. ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जातो. दररोज गाडी यावी, अशी आमची मागणी आहे, असे संजय माळी व अजित कुलकर्णी यांनी सांगितले.

कचरा गोळा करण्यासाठी या भागात दोन गाड्या आहेत. त्यामध्ये ओला सुका कचऱ्याचे स्वतंत्र भाग आहेत. गाडी भरल्यानंतर सुका कचरा असलेला भाग लवकर रिकामा होतो; परंतु ओला कचरा रिकामा करण्यासाठी जास्त वेळ लागतो. ओला कचरा नेणारी बीआरसी गाडी एक असल्याने तेथे वेळ लागतो. अक्षय पॅलेस  सोसायटीतील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. 
- राजेश आहिर, आरोग्य निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com