आळंदीत चोरून लग्न लावताय? सावधान...  

marriage
marriage

आळंदी (पुणे) : आळंदीत चोरून लग्न लावली, तर आता फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. लग्नांबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, चोरून लग्ण करणाऱ्या वधूवरांसह वऱहाडी आणि मंगल कार्यालय चालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार केशकर्तनालय, सलून, पान टप-या, हॉटेल आदींना बंदी आहे. मात्र, तरीही आळंदीत छुप्या पद्धतीने मंगल कार्यालयवाले लग्न लावत आहेत. आळंदीत चोरून लग्ने लावल्याप्रकरणी नुकताच दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगल कार्यालयांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी नाही. छुप्या पद्दतीने चोरून लग्ने केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. आळंदीत सध्या पन्नास मंगल कार्यालयांची नोंद पालिका पोलिसांकडे आहे. तसेच, बिगर नोंद असलेली चारशेहून अधिक ठिकाणी लग्ने इतरत्र लागतात. यामध्ये काही लोक स्वतःच्या घरात लग्नाचा व्यवसाय करत आहे. आळंदीत काही लोक पुणे, पिंपरी, खेड, तसेच जिल्ह्यातून आलेल्यांची लग्न कार्ये चोरून लावत आहेत. पालिका अथवा पोलिसांनी अद्याप कोणालाही लग्नासाठी परवानगी दिली नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आळंदी लग्न करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे एकाच वेळी एवढ्या कार्यालयात लग्ने लागली, तर एकाच वेळी किमान पाच हजार व-हाडी आळंदीत पुणे व पिंपरी शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आले, तर आळंदीकरांचे आरोग्य धोक्यात येईल. आजपर्यंत आळंदीकरांनी स्वतः घऱात राहून कोरानाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध पाळले आणि स्वतःचे आरोग्य जपले. मात्र, मंगल कार्यालयांच्या चुकीमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेत खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी आळंदीतील लग्नांना यापूर्वीच आदेशाद्वारे बंदी घातली. मात्र, आजही काही लोकांनी स्वतःच्या घरालाच मंगल कार्यालय बनविल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउन कालावधीत चोरून लग्न लावणाऱ्यांवर आजपासून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

तसेच, सलून, हॉटेल, पान टपऱ्या बंदी असूनही उघड्या ठेवल्या जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. अशा व्यावसायिकांवर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आता पोलिस आणि पालिका संयुक्त कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर आणि आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रवींद्र चौधऱ यांनी दिली. तसेच, शहरातील इतर व्यावसायिकांची दुकाने पाच जुनपासून दिवसाआड समविषम तारखेला सुरू ठेवली जाणार आहेत.
  
पाच जूनपासून समविषम तारखेला दुकाने चालू करण्याबाबत पालिका आराखडा तयार करत आहे. सायंकाळी पाचनंतर दुकाने चालू राहिल्यास पोलिस कारवाई करतील. दुचाकीवरही एकच व्यक्तीने प्रवास करावा. ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून फिरण्यास मज्जाव आहे. आपल्या शेजारी नविन व्यक्ती आल्यास पालिका अथवा पोलिसांना तत्काळ रात्री अपरात्री कधीही फोनवरून माहिती देण्याचे आवाहनही पोलिस आणि पालिका प्रशासनाकडून करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com