Vidhan Sabha 2019 : 'या' सहा धरणांचे पाणी दुष्काळी भागाला द्या : आंबेडकर

prakash-amedekar.jpg
prakash-amedekar.jpg

विधानसभा : पुणे : टाटांच्या मुळशी धरणासह सहा धरणांचे करार रद्द करून या धरणातील पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग व मराठवाड्याला द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात केली. कोयना धरणाचे पाणीदेखील शेतीसाठी वापरता येईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केवळ भावनिक राजकारण नको तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर राजकीय पक्षांनी बोलावे, असे आवाहन केले. 

सौर आणि पवन उर्जेचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे यापुढील काळात जलविद्युत उर्जा प्रकल्पांची गरज उरणार नाही. केंद्र सरकारच्या अहवालानुसार नॅशनल ग्रिडमध्ये वीज शिल्लक आहे. त्यामुळे जलविद्युत उर्जा प्रकल्पांचे पाणी शेतीसाठी वापरले तर पश्‍चिम महाराष्ट्र व संपूर्ण मराठवाडा सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होईल. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा राज्य सरकारने या संदर्भात पावले उचलण्याची गरज आहे. वंचित आघाडी सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प निश्‍चितपणे हाती घेईल, असे आंबेडकर यांनी सांगितले. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्राला हे पाणी कशाप्रकारे देता येईल याचे सादरीकरणदेखील यावेळी करण्यात आले. कोयना किंवा टाटांच्या धरणाचे पाणी फिरवणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य नसल्याची माहिती प्रशासन राज्य सरकारला देत आहे. मात्र, राज्य सरकारची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेच्या 288 जागा आम्ही लढवणार आहोत. निवडणुकीनंतर वंचित आघाडी विरोधात नव्हे तर सत्तेत असेल, या शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. निवडणुकीनंतर वंचित आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद असेल, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com