सरकार बदला; राज्य बदलेल

रोहित पवार
रोहित पवार

नारायणगाव - दुष्काळी स्थिती, दूध व भाजीपाल्याला बाजारभावाचा अभाव, जीएसटी, नोटाबंदी यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक हतबल झाले आहेत. सत्ताधारी सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. राज्यातील जनतेला पोटाचा व जनावरांना चाऱ्याचा प्रश्‍न पडला असताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नेते राममंदिराचा प्रश्‍न उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. सर्व जातिधर्मांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देश व राज्याच्या विकासाचा विचार करावा, असे मत व्यक्त करत सरकार बदला, राज्य बदलेल, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या पुढाकाराने येथील वसंत व्हिला सभागृहात सोमवारी (ता. २६) रात्री ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, देवदत्त निकम, रमेश भुजबळ, गुलाबराव नेहरकर, प्रकाश पाटे, शरद लेंडे, सचिन भोर, तुषार थोरात, मोहित ढमाले, जितेंद्र बिडवई आदी पदाधिकाऱ्यांसह जुन्नरमधील शेतकरी व दूध उत्पादक, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शेतकरी, व्यापारी व युवकांनी विविध समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना रोहित पवार यांनी उत्तरे दिली.राजुरी येथील गणेश दूध संस्थेचे गोविंद औटी यांनी सरकारकडून अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने संस्था अडचणीत सापडल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com