सरकारच्या धोरणांमुळे अस्वस्थता - दिलीप वळसे पाटील

वडगाव मावळ - सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी मूक आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
वडगाव मावळ - सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी मूक आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्यासह तालुक्‍यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

वडगाव मावळ - ‘‘केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्‍न निर्माण झाले असून, समाजाच्या सर्वच घटकांमध्ये अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारचे हे अपयश तळागाळापर्यंत पोचवावे व या नाकर्त्या सरकारला पायउतार करावे,’’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी येथे केले. 

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात येथील पंचायत समिती चौकात मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी वळसे पाटील बोलत होते. तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, बाबूराव वायकर, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, सुनील दाभाडे, कैलास गायकवाड, गणेश काकडे, सुरेश चौधरी, नारायण पाळेकर, अशोक घारे, विजय काळोखे, संतोष मुऱ्हे, ॲड. जगन्नाथ गोपाळे, अर्चना घारे, सुनीता काळोखे, रूपाली दाभाडे, वैशाली दाभाडे, रमेश घोजगे, चंद्रजित वाघमारे, विशाल वहिले, भाऊसाहेब ढोरे, अतुल राऊत, पूजा वहिले, पूनम जाधव, शारदा ढोरे आदी उपस्थित होते. 

वळसे पाटील म्हणाले, ‘‘भुलभुलय्या करून सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने गेल्या साडेचार वर्षांत एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. शेतकरी, उद्योजक, व्यापारी, असे सर्वच घटक असमाधानी आहेत. देशाच्या सीमा असुरक्षित बनल्या आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या विविध धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. देशात अशांतता निर्माण झाली असून जीवन असुरक्षित बनले आहे. त्यास सरकारचा नाकर्तेपणा व चुकीची धोरणे कारणीभूत आहेत.’’ मावळ तालुक्‍यात पक्षाची ताकद मोठी आहे. सर्वांनी एकत्रित राहिल्यास परिवर्तन निश्‍चित घडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

तालुकाध्यक्ष भेगडे म्हणाले, ‘‘सत्य, अहिंसा ही महात्मा गांधीजींची तत्त्वे मोडीत काढण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात पक्षाने हे मूक आंदोलन केले आहे.’’ सचिन घोटकुले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com