हडपसर - यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर देशाला लाभलेले उत्तम प्रशासक म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. सर्वसामान्य लोकांशी नाते जोडणारे हे नेतृत्व असल्याने पवार हे खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन व रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष ॲड. राम कांडगेलिखित ‘लोकनेता शरद पवार’ या संदर्भ ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी वैद्य बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ शेवाळे, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष जालिंदर कामठे, मीनाताई जगधने, विजय कोलते, भाऊसाहेब कराळे, सतीश खोमणे, पोपटराव गावडे, प्राचार्य डॉ. अरविंद बुरूंगले, डॉ. अशोक भोईटे, डॉ, पांडुरंग गायकवाड, डॉ. शर्मिला चौधरी, चंद्रकांत जाधव, उत्तमराव आवारी, अशोक जगदाळे उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, ‘‘देशाच्या राजकारणात नव्हे; तर सर्व क्षेत्रांत वेगळी ओळख पवार यांनी त्यांच्या कार्यातून निर्माण केली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे व देशाचे भवितव्य घडविणारे, सर्वसामान्यांचा विचार करणारे, महिलांना आरक्षण देणारे, शेतकऱ्यांचा कैवारी असलेले पवार हे महाराष्ट्राचे वैभव आहेत.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.