निकाल लागूनही पदरी निराशाच; विमा कंपनी अपिलात गेल्यास भरपाईस उशीर 

निकाल लागूनही पदरी निराशाच; विमा कंपनी अपिलात गेल्यास भरपाईस उशीर 

पुणे : घरातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यामुळे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या दाव्यात मोठी रक्कम मंजूर झाल्यास विमा कंपन्यांकडून उच्च न्यायालयात अपील करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खालील न्यायालयात लढा देऊन निकाल लागल्यानंतरही कुटुंबीयांना उच्च न्यायालयात चकरा माराव्या लागत आहेत. 

अधिकाधिक नुकसानभरपाई मिळावी, असा प्रयत्न निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचा असतो. मात्र, रक्कम 25 लाखांच्या पुढे गेल्यास विमा कंपन्या उच्च न्यायालयात अपील करतात. त्यामुळे खालील न्यायालयाने मंजूर रक्कम तक्रारदारांना त्वरित द्यावी लागत नाही. उलट अपिलाचा निकाल लागण्यात काही वर्षे जातात.

प्रत्येक तक्रारदाराला उच्च न्यायालयात दावा चालवणे अशक्‍य होते. त्यामुळे तो कमी रक्कम घेण्यास तयार होतो. लोकअदालतीतूनदेखील हे दावे निकाली लागतात. मात्र, तक्रारदाराला अपेक्षित रक्कम मिळेलच, असे नाही. त्यामुळे त्याचा दावा चालविण्यावर भर असतो. 

तडजोडीमुळे तक्रारदार हतबल 

तक्रारदाराला द्यावी लागणारी रक्कम कमी व्हावी किंवा निकालानंतर देखील त्याने तडजोड करावी म्हणून सध्या विमा कंपन्या उच्च न्यायालयात अपील करतात. दावा चालविण्यासाठी वकिलांची टिम असते. मात्र, सर्वसामान्य तक्रारदाराला त्याठिकाणी दावा चालवणे अशक्‍य होते.

मुळात घरातील कमावती व्यक्ती गेल्याने ते आर्थिकदृष्ट्या निराधार असतात. त्यामुळे ते कमी रक्कम स्वीकारून दावा मिटवत आहेत. असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य ऍड. अतुल गुंजाळ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com