शिवसेनेचे मतपरिवर्तन झाल्यास स्वागत - गिरीश बापट

girish-bapat
girish-bapat

पुणे - शिवसेनेबरोबर आमचे काही भांडण नाही. आम्ही एका मनाचे, एका दिलाचे आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना दिलेल्या अनुभवानंतर त्यांच्यात जर काही मतपरिवर्तन झाले असेल, तर भाजप त्यांचे स्वागत करील, अशी प्रतिक्रिया खासदार गिरीश बापट यांनी दिली.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना ते ‘सकाळ’शी बोलत होते.

बापट म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. त्यामुळे युतीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे जनता शिवसेनेवर आणि काँग्रेसवर नाराज आहे. कुणीच सरकार स्थापन करू न शकल्याने पेच निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. हीच स्थिती कायम राहील, असे नाही. विरोधक एकत्र आले, तर ते सरकार बनवू शकतील.’’

लोकांना सरकार युतीचेच पाहिजे होते. त्याचा विचार शिवसेनेने केला पाहिजे. त्यानुसारच लोकशाही मार्गाने आम्ही प्रयत्न केला. पण, शिवसेनेने काय केले, हे आपण सर्वांनी पाहिले. त्यानंतर सर्व पक्षांना संधी देण्यात आली होती. पण, कुणीही सरकार स्थापन केले नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू झाली. या पुढील काळात शिवसेना बरोबर यायला तयार झाली, तर पक्षाचे नेतृत्व त्यावर निर्णय घेईल. शिवसेना आणि भाजपचे वैर नाही, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com