इंदापूर तालुक्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

माळवाडी नं. २ (ता. इंदापूर) - उजनी धरण पाणलोट क्षेत्रात घेण्यात आलेल्या चारीत मोठ्या संख्येने असलेले  कृषीपंपांचे पाइप.
माळवाडी नं. २ (ता. इंदापूर) - उजनी धरण पाणलोट क्षेत्रात घेण्यात आलेल्या चारीत मोठ्या संख्येने असलेले कृषीपंपांचे पाइप.

उजनीत निचांकी साठा; ४५ गावांमधील पाणीयोजना पडणार बंद
इंदापूर - उजनी धरणातून सोलापूर शहराची तहान भागविण्यासाठी पिण्याचे पाणी भीमा नदीतून सोडण्यात आल्याने तालुक्‍यातील पाणलोट क्षेत्रात पाणीपातळी कमालीची घटली. त्यामुळे तालुक्‍यातील ४५ गावांच्या पिण्याच्या पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

मूळ भीमा नदी पात्रात नागरिकांनी किमान पाचशे तर जास्तीत जास्त दीड किलोमीटरच्या सामूहिक चाऱ्या घेतल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे ५०० ते ६०० कोटी रुपयांचा भुर्दंड पडला आहे. ‘धरण उशाशी, कोरड घशाशी’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. यंदा उजनी धरणाने नीचांकी पातळी गाठली असून, धरण इतिहासात हा नवा विक्रम झाला आहे. उजनीची पाणीपातळी घटली की चारीतील पाणी संपत आहे. त्यामुळे चारी वाढविणे, पाणी खेचण्यासाठी पाइप वाढविणे, रात्रीअपरात्री पाइप जोडण्यासाठी जीव धोक्‍यात घालून शेतकऱ्यांना काम करावे लागत आहे. वीज उपलब्धतेनुसार शेतकरी आळीपाळीने चाऱ्यात काम करत आहेत. त्यातच पळसदेव येथील नारायण लावंड या शेतकऱ्याचा मोटार सुरू असताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. त्यामुळे मोटार जोडताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. 

यासंदर्भात माळवाडी नं. २ येथील शेतकरी माधव मोरे म्हणाले, ‘‘सरकारने शेतकऱ्यांना चारी घेण्यासाठी मोफत पोकलेन व पाइप उपलब्ध करून दिले पाहिजेत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com