वीजबिले भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय

महावितरणने कोणतीही पूर्व सूचना न देता वीजबिले थकीत असल्याचे कारण देत वीज बंद केली आहे.
Farmers Light Bill
Farmers Light BillSakal

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धामणी, लोणी, वडगावपीर,मांदळेवाडी, रानमळा, खडकवाडी, वाळुंजनगर या गावातील थ्री फेज जोडण्या असणारे ट्रान्सफार्मर ( रोहित्र ) महावितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता वीजबिले (Light Bill) थकीत असल्याचे कारण देत बंद केली आहे. त्यामुळे नियमित वीजबिले भरणाऱ्या शेतकर्यांवर अन्याय झाला आहे विहिरीवरील शेतीपंप बंद पडल्याने शेतकर्यांना (Farmers) जनावरांसाठी डोक्यावर तसेच वाहनातून पाणी आणावे लागत आहे शेतातील पिकांनाही पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.(Pune News)

Farmers Light Bill
कोरोनाच्या काळात बारामतीच्या डॉक्टरांनी केल एक वेगळ संशोधन

लोणी येथे महावितरणचे वीज उपकेंद्र असून त्या अंतर्गत वरील सर्व गावांना वीज पुरवठा केला जातो.हि सर्व गावे जिरायती भाग म्हणून ओळखला जातो या गावांमध्ये नेहमीच दृष्काळ सदृश् परिस्थिती असते .या परिसरात दरवर्षी पावसाचे अत्यल्प प्रमाण असून या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे चालू वर्षी पावसाने दडी मारल्याने या परीसरातील ओढे,नाले,बंधारे, पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत.ज्यांना थोडे फार पाणी आहे.अशा शेतकर्यांचे विहिरीवरील शेतीपंपाचे वीजपुरवठा बंद केल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत.तर नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न (Question) गंभीर बनला आहे.ज्या शेतकर्यांनी वीज बिले भरली त्यांच्यावर अन्याय झाल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Farmers Light Bill
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभुमीवर पुण्यात रविवारी कडक पोलिस बंदोबस्त

आम्ही वीज बिल भरू पण महवितरण कंपनीने कुठलिही कल्पना न देता वीजजोड तोडण्यांचे किवा थेट रोहित्र बंद करण्याचे धोरण अवलंबले आहे त्यामुळे नियमित वीजबिले भरणाऱ्या शेतकर्यांवर अन्याय होत आहे अशा शेतकर्यांची तोडलेले वीज जोड तातडीने जोडून वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोणीच्या सरपंच ऊर्मिला धुमाळ, माजी सरपंच उद्धवराव लंके, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील,अवसरी बुदुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाळाशिराज वाळुंज, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके यांनी दिला आहे. या संदर्भात मंचर येथील महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता जयंत गेटमे यांच्याशी संपर्क (Contact) केला असता त्यांनी सांगितले ज्या शेतकर्यांनी वीजबिले भरली आहे त्यांनी महावितरणच्या कर्मचार्यांशी संपर्क करावा त्यांचे वीज जोड पूर्ववत जोडून दिले जाईल असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com