व्यवसायात नावीन्य महत्त्वाचे - डॉ. कुलकर्णी

व्यवसायात नावीन्य महत्त्वाचे - डॉ. कुलकर्णी

पुणे - ‘व्यवसाय करताना नावीन्यता आणि कुटुंबीयांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. व्यवसाय उभारताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र या समस्यांना घाबरून जाण्याऐवजी त्याचे संधीमध्ये रूपांतर केले, तर आपण यशस्वी होऊ शकतो. नातेवाइकांवर विश्‍वास आणि एकमेकांच्या विचारांचा आदर ठेवणे हे उत्तम व्यावसायिक असल्याचे लक्षण आहे,’ असे मत एलके केमिकल्सचे संस्थापक संचालक डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाच्या २७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. रवींद्र कुलकर्णी व ‘युरोपा लॉक्‍स’चे व्यवस्थापकीय संचालक सलील जोशी यांची सुधीर गाडगीळ यांनी प्रकट मुलाखत घेतली. या वेळी दोन्ही उद्योजकांचे कुटुंबीय, मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी, श्रीपाद करमरकर, माधव गोडबोले, राहुल कुलकर्णी, प्रसाद पटवर्धन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

सलील जोशी म्हणाले, ‘कठोर परिश्रम आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर व्यवसाय वृद्धी होते. कुलपासारख्या उत्पादनांचा व्यवसाय सुरू करणे सुरवातीला जिकिरीचे वाटत होते. परंतु गुणवत्ता, कामातील प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी जोडलेली नाळ यामुळे आज ‘युरोपा लॉक्‍स’ यशस्वी कामगिरी करीत आहे. व्यवसायात ‘टर्न ओव्हर’पेक्षा ‘कलेक्‍शन’ला महत्त्व दिले पाहिजे. तरुणांनी जिद्द, मेहनत आणि नावीन्यतेचा ध्यास घेऊन काम केले, तर कोणत्याही क्षेत्रात व्यवसाय उभा करता येतो.’ या कार्यक्रमात गजानन चाफळकर, चिंतामणी हसबनीस, प्रज्ञा आगाशे, नरेंद्र काळे, प्रतिभा भांबूरकर या व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला. विशाखा वेलवणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक सुप्रिया देव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com