भगवान महावीरांच्या काळातही महामारीविरोधात अशी होती उपाययोजना

jain.jpg
jain.jpg

जैन धर्म आणि महामारी :

गणिवर्य वैराग्यरतिविजयजी महाराज

आज गुरुपौर्णिमा. गुरूचे माहात्म्य आपण सर्व जाणतोच. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, आपल्या गुरूंनी दूरदृष्टी दाखवत त्याकाळात महामारीबाबत काय सांगितले ते पाहू. गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना विषाणूपासून उत्पन्न होणाऱ्या कोविड -19 या आजाराने त्रस्त आहे. छोट्या आणि अदृश्‍य विषाणूला रोखण्यासाठी कोणताच उपाय आजच्या प्रगत विज्ञानाजवळ अजूनपर्यंत उपलब्ध झालेले नाही. या विषाणूपासून संक्रमित होऊ नये यासाठी आपण फक्त काळजी घेऊ शकतो. सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, तोंडाला मास्क लावणे इत्यादींच्या उपयोगाने या विषाणूंच्या संक्रमणापासून आपण वाचू शकतो. लॉकडाऊन आणि क्वारंटाइन (एकांतवास) सारखे अनेक शब्द याकाळात प्रचलित झाले. 

पूर्वीपासूनच कोरोनासारख्या महामाऱ्या जगाला विळखा घालत आलेले आहेत. अशा प्रसंगी काय करणे गरजेचे आहे याचे निर्देश पुरातन जैन ग्रंथात (आगम) मिळतात. ई.स.पूर्व तिसऱ्या शतकात आचार्य श्री भद्रबाहुस्वामींनी रचलेल्या "ओघनिर्युक्ति' या ग्रंथात काही निर्देश मिळतात. महामारीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला एकांतवासात ठेवणे. महामारीच्या काळात अत्यंत आवश्‍यक कारणांशिवाय बाहेर न जाणे, असे सुचविले आहे. 
यावर्षी चातुर्मासाचा कालावधी कोरोनाच्या प्रभावामध्ये व्यतीत होत आहे. तसे पाहिले तर प्रत्येक वर्षाचा चातुर्मास हा लॉकडाउन सारखाच असतो. जैन परिभाषेत चातुर्मासाला पर्युषणा हा शब्द प्रचलित आहे. पर्युषणा शब्दाचा अर्थ होतो, सर्व प्रकारच्या शारीरिक प्रवृत्तींचा त्याग करून एका जागी राहणे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चातुर्मासामध्ये जैन साधू-साध्वी विहारयात्रा करीत नाहीत. अनेक धर्म-संप्रदायातील संन्यासीसुद्धा एकाच जागी निवास करतात. गृहस्थवर्ग सुद्धा व्यापार कमी करतो. लग्न समारंभ होत नाहीत. बाहेर गावी जात नाहीत. सक्रियतेचा त्याग करून, शांत राहून आपल्या अस्तित्वाच्या मुळाला मजबूत बनविण्याचे कार्य करतात. चातुर्मासाचा कालावधी शारीरिक व्यक्तिमत्त्वाला विश्रांती देऊन आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाला उजागर करण्याची संधी आहे. कोरोना महामारीने मनुष्यजातीला आपल्या आध्यात्मिक शक्तीकडे लक्ष देण्यासाठी सूचित केले आहे. कोरोनामुळे लागलेले लॉकडाउन भीतीने प्रेरित झालेले होते तर चातुर्मासाचे लॉकडाउन हे ध्येयाच्या प्रेरणेने प्रेरित आहे. आत्मजागृतीचा अभ्यास हेच चातुर्मासाचे लक्ष्य आहे. 
(शब्दांकन : दीपक मुनोत)  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com