केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काल कोल्हापुरात बोलताना. लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा मोदींच्या झोळीत टाका, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
"महाराष्ट्रात ४८ जागा जिंकण्याची गरज भाजप का निर्माण झाली आहे. देशात भाजपचा संख्या कमी झाल्याने महाराष्ट्र ४८ मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहे. मविआ तीन पक्ष एकत्रित आल्यास भाजपला केवळ १३ ते १४ जागा मिळती", असे जयंत पाटील म्हणाले.
भाजपच्या हातून निवडणूक गेली -
मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधानामुळे अनुक्रमे कसबा आणि चिंचवड येथील विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या आहे. त्यामुळे या मतदासंघाची पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी थेट लढाई सुरू आहेत. दिग्गज नेते कसबा आणि चिंचवडमध्ये ठाण मांडून बसले आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी भाजपच्या हातून निवडणूक गेल्याचे वक्तव्य केले आहे.
जयंत पाटील म्हणाले, भाजपच्या हातून निवडणूक गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोज इकडे येत आहेत. कसब्यात जनता धडा शिकवेल म्हणून भाजपला धडक बसली आहे.
शिवसेनेच्या वादावर जयंत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे जिकडे जातील तिकडे जनता जाईल. पक्ष नाव चिन्ह यापेक्षा त्यांचे काम मोठ आहे. सुप्रीम कोर्टात आयोगाबाबात अंतिम निर्णय होणे बाकी आहे. जे पक्ष चोरून घेऊन गेले आहेत त्यांना जनता धडा शिकवेल. शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. मात्र तो तिसऱ्याने चोरून नेला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.