Katraj Kondhwa Road : अस्तित्वातील कात्रज-कोंढवा रस्ता चांगला करण्यासाठी अखेर जाग

भुसंपादनामुळे कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले. पण जो रस्ता सध्या अस्तित्वात आहे त्याच्या दुरुस्तीकडेही पथ विभाग दुर्लक्ष करत होते, त्यामुळे रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
Katraj-Kondhwa road
Katraj-Kondhwa roadsakal
Summary

भुसंपादनामुळे कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले. पण जो रस्ता सध्या अस्तित्वात आहे त्याच्या दुरुस्तीकडेही पथ विभाग दुर्लक्ष करत होते, त्यामुळे रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

पुणे - भुसंपादनामुळे कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले. पण जो रस्ता सध्या अस्तित्वात आहे त्याच्या दुरुस्तीकडेही पथ विभाग दुर्लक्ष करत होते, त्यामुळे रोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. अखेर प्रशासनाला जाग आली आहे. रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण काढणे, साइड पट्ट्यांमध्ये डांबरीकरण करून दोन्ही बाजूने रस्ता वाढविणे, दुभाजक टाकून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. ही कामे एका महिन्यात पूर्ण केली जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, सासवड रस्ता या भागातून येणारे अवजड वाहने कात्रज कोंढवा रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जातात. त्यामुळे या रस्त्यावर कायम अवजड वाहनांची वाहतूक असते. हा सुमारे ३ किलोमीटरचा रस्ता ८४ मीटर रुंद करण्यात येणार होता. चार वर्षापूर्वी त्याचे भूमिपूजनही झाले. पण जागा ताब्यात नसल्याने हा प्रकल्प अर्धवट राहिला आहे. ८४ मीटरचा रस्ता करण्यासाठी भूसंपादनासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार होता. तेवढे पैसे महापालिकेकडे नाहीत, त्यामुळे ५० मीटरचा रस्ता करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागामालकांना नुकसानभरपाई देण्यासाठी २०० कोटी रुपये मिळणार आहेत. ही प्रक्रिया होण्यास काही महिन्याचा कालावधी लागणार आहे.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आज कात्रज कोंढवा रस्त्याची पाहणी केली. ज्या जागा ताब्यात आल्या आहेत. तेथून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. त्याच प्रमाणे सध्या जो अस्तित्वातील रस्ता आहे, तेथे खड्डे पडले आहेत किंवा तो भाग रस्त्याला समपातळीत नाही. त्यामुळे त्या जागेचा वापर होत नाही. या साइड पट्ट्यांचे काम केल्यास दोन्ही बाजूला किमान पाच ते सहा फुटाची अतिरिक्त जागा निर्माण होऊन कोंडी कमी होऊ शकणार आहे. त्याच प्रमाणे या रस्त्याचे डांबरीकरण केलेले जाणार आहे.

‘रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइड पट्ट्यांची जागा वाया जात आहे. तो भाग वापरातच येत नाही. त्यासाठी तेथे डांबरीकरण केल्यास रस्ता मोठा होईल. त्याच प्रमाणे सध्या कोणतीही गाडी कुठूनही वळत असल्याने अवजड वाहनांना अडथळा होत आहे. त्यातून वाहतूक कोंडी वाढते. हे टाळण्यासाठी रस्त्यामध्ये दुभाजक टाकले जातील. काही मोजक्याच ठिकाणी वळण्यासाठी जागा असतील.’

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com