पुणे - कर्णबधिर (दिव्यांग) आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. यातून सरकारची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘ज्या अधिकाऱ्यांनी लाठीमार करण्याचे आदेश दिले, त्यांची गृहमंत्र्यांनी तत्काळ हकालपट्टी करावी.’’
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘लाठीमाराची घटना निषेधार्ह आहे. या मुलांचे किमान म्हणणे तरी सरकारने ऐकून घेणे आवश्यक होते. या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा.’’
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘कर्णबधिर त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत होते. पोलिसांनी त्यांना बदडून काढले. या सरकारला काय म्हणावे! ’’ हा प्रकार म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या असंवेदनशीलतेचा कळस आहे, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले, ‘‘ज्या मुलांना बोलता, ऐकता येत नाही त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश देणाऱ्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिक्षक हवेत ही चुकीची मागणी आहे? अधिकाऱ्यांना सांगूनही ते ऐकत नसतील तर सरकारचा काही उपयोग आहे का?’’
सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.