पाण्याचे आवर्तन सोडा ; शेतकऱ्यांची मागणी

पाण्याचे आवर्तन सोडा ; शेतकऱ्यांची मागणी

उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेल्या शिरसाई उपसा सिंचन योजनेतून टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी लाभार्थी गावातून मागणी होत आहे.

बारामती जिरायती भागातील कारखेल, खराडेवाडी, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, साबळेवाडी, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बऱ्हाणपूर या गावाना शिरसाई उपसासिंचन योजना वरदान ठरत आहे. 

बारामतीच्या जिरायती भागात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी या भागाला शिरसाईचे आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्यामुळे काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर जनावरांना चारा पिके व ज्वारीची पिके घेतली आहेत. मात्र, सध्या विहिरीतील पाणी तळ गाठू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे या भागातील रब्बी हंगामातील ज्वारी, मका , कांदा तसेच चारा पिके सुकू लागली आहेत.

या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन मिळावे, यासाठी जराडवाडी, सोनवडी सुपे , कारखेल, उंडवडी कडेपठार, उंडवडी सुपे, कारखेल या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत आवर्तन मागणीचे पत्र ग्रामपंचायतीच्या वतीने आज शनिवारी पुणे येथील उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुधीर वैद्य यांना देण्यात आले आहे. यावेळी उंडवडी कडेपठारचे माजी सरपंच विठ्ठल जराड, उंडवडी सुपेचे उपसरपंच पोपट गवळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.  

याबाबत उपसरपंच पोपट गवळी म्हणाले, आम्ही आज एकत्रित येत पाटस येथील उपसा सिंचनच्या कार्यालयात, तसेच पुण्यातील अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्याला शिरसाई योजनेतून पाणी मिळावे, यासाठी लाभार्थी असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतीचे पाणी मागणीचे निवेदन दिले आहे." 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com