Vidhan Sabha 2019 : आता टीका कोणावर करायची? - उद्धव ठाकरे

पिंपरी - प्रचार सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
पिंपरी - प्रचार सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘लोकसभा निवडणुकीला विरोधी पक्षांची हालचाल दिसून येत होती. मात्र, आता काँग्रेस नामशेष झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बंधारा फुटला आहे. त्याला गळती लागली आहे. त्यामुळे आता टीका कोणावर करायची?,’’ असा उपरोधिक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लगावला.

शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी चौक येथे ठाकरे बोलत होते. या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. भाषणात ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार की नाही, असे वातावरण होते. विधानसभा निवडणुकीतही नुसती गर्दी नाही; तर उत्साहाचे वातावरण आहे. गेले काही दिवस राज्यात सूडाचे राजकारण केले असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ते जेव्हा सत्तेमध्ये होते. तेव्हा धर्माने आणि न्यायाने राजकारण करत होते काय? आम्ही ताकाला जाऊन भांडे लपविणार नाही. राज्यात सेना-भाजप सत्ता मिळविण्यासाठी जरूर लढतोय. पण, आम्हाला गोरगरिबांसाठी सत्ता हवी आहे. आम्ही एकविचाराने युती केली.

आमच्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवरून नक्की वाद होते. मात्र, आमच्यातील कुरबुरी संपून टाकल्या आहेत. आमचे सरकार लोकहिताला प्राधान्य देईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com