Vidhan Sabha 2019 : माझ्यासाठी प्रश्‍न सोडविणे महत्त्वाचे - विलास लांडे

Vilas-Lande
Vilas-Lande

विधानसभा 2019 : पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत आपण विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. मात्र, कधी फ्लेक्‍सबाजी केली नाही, की सोशल मीडियावर ढोल बडविले नाहीत. माझ्यासाठी सामान्यांचा प्रश्‍न सोडविणे महत्त्वाचे होते, असे मत भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी व्यक्त केले.

लांडे म्हणाले, ‘‘गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने अनधिकृत बांधकामे, शास्तीकराची शंभर टक्के माफी करण्याचे आश्‍वासन दिले होते. याच प्रश्‍नावर त्यांचे आमदार, नगरसेवक निवडून आले. प्रत्यक्षात पाच वर्षे होऊनही प्रश्‍न सोडवू शकले नाहीत. केवळ अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाची फक्त आवई उठविली. जाचक अटी-शर्ती लादत प्रश्‍न कायम चिघळत ठेवून पोळी भाजून पदांचा लाभ कसा उठविता येईल, याची दक्षता घेतली. न्यायालयाच्या आदेशाचा कोणताही अडथळा बांधकाम नियमितीकरण प्रक्रियेत येऊ नये, याबाबतची दक्षता घेण्यासाठी आधीच्या सरकारकडून हा निर्णय घेण्यास विलंब झाला. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सवंग प्रसिद्धीचे निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारने अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाचा प्रश्‍न अधिकच किचकट करून ठेवला आहे. मागील पाच वर्षांत अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न सुटल्याची होर्डिंगबाजी झाली. भाजप नेत्यांनी स्वतःची पाठ थोपटत हारतुरे सत्काराचे ‘इव्हेंट’ केले. भैरवनाथाची शपथ घेऊन, किती अनधिकृत बांधकामे नियमित झाली, याची आकडेवारी त्यांनी जाहीर करावी. अशा नागरिकांची नावे होर्डिंगवर जाहीर करावीत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com