आळंदीत मराठा मोर्चा, राणे पितापुत्रांचा निषेध

alandi
alandi

आळंदी (पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मराठा आंदोलनाबाबत वेगवेगळी वक्तव्य व्यक्त करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे मराठा आरक्षणासाठी प्रयत्नात असल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात दोघा पितापुत्रांची धडपड मराठा आरक्षणासाठी नसून त्यांच्या वैयक्तित मंत्रीपदाच्या लालसेसाठी आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील भडकावू विधाने करणाऱ्या मंत्र्यांसह राणे पितापुत्राचा आज आळंदीत मराठा मोर्च्याच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चासाठी शेकडो मराठा आंदोलकांनी हजेरी लावली. तर शहरातील दुकाने सकाळपासूनच बंद ठेवून शासनाच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी मोर्चाची सुरूवात सकाळी साडेदहाच्या दरम्यान आळंदीतील चाकण चौकातून करण्यात आली. त्यानंतर प्रदक्षिणा रस्त्यावरून मोर्चा चावडी चौक, महाद्वार चौक आणि पालिका चौकात आणण्यात आला. यावेळी मरकळ चौक आणि पालिका चौकात मोर्चेकरांनी ठिय्या मारून रास्ता रोको केला.पालिका चौकातून नदीपलिकडे देहूफाटा येथे मोर्चे करांनी सरकारच्या विरोधात घोषणात देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली.

दरम्यान मोर्च्यासाठी शहरातील माजी नगरसेवक डी.डी.भोसले,नगरसेवक प्रकाश कु-हाडे,उत्तम गोगावले,संदिप नाईकरे,आनंद मुंगसे,योगेश दिघे,लखन घाटगे,संग्राम भंडारे,भागवत शेजवळ यांच्यासह सविता गावडे,मंगल हुंडारे,रूपाली पानसरे,पुष्पा कु-हाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान उत्तम गोगावले यांनी सांगितले की,राणे पितापुत्र स्वतःच्या लाभासाठी सरकारबरोबर चर्चा करत आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलनाचा राणे पितापुत्रांशी संबंध नाही. यामुळे सकल मराठा आंदोलक जी भूमिका घेतील तीच सर्वांनी मान्य करायची आहे. संदिप नाईकरे यांनी सांगितले की,निवडणूकीत दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत.मराठा समाजाची दिशाभूल सत्ताधा-यांकडून केली जात आहे.राज्यातील आंदोलने आणि मोर्च्यांना सरकार सामोरे जात नाही हे सरकारचे अपयश आहे. डि.डी.भोसले यांनी सांगितले की,मुख्यमंत्री विठ्ठलाची पुजा घरीच करतात तर आता पंधरा ऑगस्टला झेंडा मंत्रालयात नाही तर नागपूरात स्वताच्या घऱी फडकावा लागेल.आंदोलन कमकुवत करण्याचा डाव महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री करत आहे.

लक्ष्मण महाराज पाटील यांनी सांगितले, मराठा आंदोलनास ज्या पक्षांनी पाठिंबा दिला नाही त्यांना पुढील निवडणूकीत सहकार्य करायचे नाही.मराठा ठोक मोर्चात आजही अनेक पुढारी घऱीच बसून आहेत.मिडीयासमोर भाषणबाजी करतात.मात्र आगामी निवडणूकीत मराठा आरक्षणाच्या हितार्थ जो भूमिका घेणार नाही त्यांना कायमचेच घरी बसविण्यासाठी मराठा मोर्चा निवडणूकीतही एकत्र येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com