नंदिनी जाधव यांनी केले ३८ महिलांना जटा मुक्त

Nandini Jadhav
Nandini Jadhav

हडपसर : केसातल्या जटा ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. केसात जटा झालेल्या स्त्रियांच्या मनातली भीती दूर करायची, त्यांना जटा सोडवून घेण्यासाठी तयार करायचं, केसातल्या जटा सोडवायच्या, त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचं आणि वेळोवेळी समुपदेशन करायचं असं मुलखावेगळं काम जटामुक्त समाजाचा वसा घेतलेल्या हडपसर येथील नंदीनी जाधव यांनी. कोणताही मोबदला न घेता गेली पाच वर्षे त्या हे कार्य करीत आहेत. त्याच बरोबर त्या अंनिसच्या माध्यमातून समाजातील अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य गावोगावी जावून करीत आहेत.

नंदिनीताईंनी अत्तापर्यंत ३८ महिलांना जटांच्या ओझ्यातून मुक्ती दिली आहे. महिलांच्या डोक्यावरील ५ ते ११ किलो वजणाच्या जटा त्यांनी कमी केल्या आहेत. ही मुक्ती डोक्यावरच्या जटांचीच नसते तर त्या सोबतीने येणा-या अनेकविध अंधश्रध्देतून बायका, त्यांचे कुटूंबीय आपसुकच बाहेर पडतात. ही किमया एका दिवसात घडत नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो. अपमान गिळावा लागतो आणि प्रसंगी आवाजही चढवावा लागतो. ही कला नंदिनीताईंनी आता चांगलीच अत्मसात केली आहे. 

मध्यवर्गीय सुखवस्तू घरातल्या नंदिनीताई मुळच्या मेकअप आर्टीस्ट. ब्युटिशनचंही प्रशिक्षण त्यांनी घेतलयय. पहिल्यापासून समाजकार्याची आवड. स्त्री अभ्यास केंद्राच्या एका कार्यक्रमात डॅा. नरेंद्र दाभोळकर आले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीसोबत जोडल्या गेल्या. जटा असलेल्या महिलांच्या जटा सोडविण्याची प्रथम संधी अंनिसच्या माध्यमातून त्यांना प्रथम मिळाली. त्यांच ब्युटिशनचं प्रशिक्षण येथे कामी आले. ब्युटिशीयन व्यवसायातून त्यांना दरमहा एक लाख उत्प्न मिळत. मात्र त्यांनी या व्यवसायावर व उत्पन्नावर पाणी सोडून पूर्णवेळ जटा मुक्त समाजाचा व अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतल. 

अस्वच्छतेमुळे केसांमध्ये तयार होणा-या जटांकडे अंधश्रध्देच्या चष्म्यातून पाहिल जात. यामगची शास्त्रिय कारण महिला व त्यांच्या कुटुंबियांना समाजावून त्या सांगतात. अनेकदा जट आलेल्या महिलांच्या अंगातही येत. पण अंगात येण हादेखील एक मानसिक आजारच असतो. याविषयी नंदिनीताई सांगतात, अंगात येण हा हिस्टोरियाचा प्रकार असतो. माणसिक तणाव असह्य झाला की, त्या अशा विचित्र वागतात. केसात जट झाली की त्यांना अनेक शुभकार्यापासून दूर ठेवल जात. वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय सुरू होतात. यातून त्या नैराशात जातात. ते बाहेर काढण्याच काम त्यांच हे अंगात येण करत असतं. त्यासाठी सुध्दा डॅाक्टरांची मदत घेणे गरजेचे असते. अशा अंधश्रध्देतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून महिला व कुटूंबियांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. 

नंदिताई म्हणाल्या, जटा सोडवल्यावर देवीचा कोप होईल, जटा सोडवणाऱ्याचे हात झडतील, डोळे जातील, अशा अंधश्रद्धा आजही मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे जटा सोडवून घेण्यासाठी या स्त्रिया तयार होत नाहीत. त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना जटा होण्यामागची कारणं आणि जटा सोडवणं का आवश्यक आहे हे पटवून देणं महत्त्वाचं आहे. एकदा का ती स्त्री जटा सोडवून घ्यायला स्वखुशीने तयार झाली की अर्धी लढाई जिंकल्यासारखी आम्हाला वाटते. जटा सोडवणं म्हणजे केवळ केसांमध्ये झालेला गुंता सोडवणं एवढंच या समस्येकडे पाहून चालणार नाही. जटा सोडवून घेतल्यावर त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिच्यामध्ये निर्माण झालेला आत्मविवास, त्या स्त्रीची आणि तिच्या नातेवाईकांची बदललेली मानसिकता, अंधश्रद्धांमुळे होणाऱ्या नुकसानीची जाणीव, जीवनशैलीमध्ये घडून आलेला फरक या सगळ्या गोष्टी निकोप आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज निर्माण करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

खेडेगावांमध्ये जटांची समस्या प्रकर्षांने आढळते. विशेष म्हणजे, या सगळ्या गावांमध्ये मोबाइल वापरला जातो. इंटरनेट पोहोचलं आहे. पण या सगळ्याबरोबर अत्यंत आवश्यक असणारी वैज्ञानिक वृत्ती मात्र समाजाच्या सगळ्या थरांमध्ये पोहोचलेली नाही. त्यामुळेच वैयक्तिक अस्वच्छतेमुळे निर्माण झालेल्या केसातल्या जटांचा संबंध देवाशी जोडला जातो. दुदैवाने केसांमध्ये जटा होण्यामागची कारणमीमांसा लक्षात न घेता त्याचा संबंध रेणुका, यल्लमा, भवानी किंवा अन्य देवीदेवतांशी जोडला जातो. जटा असलेल्या स्त्रीच्या शरीरात देवीचं अस्तित्व आहे, या भावनेने या जटांची मनोभावे पूजा केली जाते. तर दुसरीकडे जटांमुळे त्या स्त्रियांना घराबाहेर काढणे, वाळीत टाकणे आणि त्यामुळे त्या स्त्रीचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडणे अशा घटना घडताना आढळतात. यासाठी अंनिसच्या माध्यमातून शिबिर घेवून जनाजागृती करण, व्याखाने देणं अशा विविध माध्यमांतून नंदिनीताईंच काम मोठय़ा धडाडीने सुरू आहे.

कर्मकांड, बुवाबाजी, देवदेवस्कीच्या अंधश्रद्धांत सर्वाधिक बळी जाते ती स्त्री. मात्र समाज व्यवस्थेने-कुटुंबाने लादलेलं परंपरेचं जोखड स्त्रिया आता झुगारून देत आहेत. नंदिनीताई सांरख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सारासार विवेकबुद्धी बाजूला ठेवून भावनिक पेचामध्ये अडकलेल्या अनेकजणी अंधश्रद्धेची ही पाचर मोकळी करू पाहत आहेत... बदलाची नांदी सुरू झालीय! हे मान्य करायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com