आताच्या सरकारचे खेळाकडे दुर्लक्ष - अजित पवार

Ajit-pawar
Ajit-pawar

सोमेश्वरनगर : पवारसाहेबांनी क्रीडाक्षेत्रात अधिकचे लक्ष देऊन आर्थिक तरतुदीही केल्या. आमच्या सरकारनेही बरीच मदत केली. मी अर्थमंत्री असताना राष्ट्रीय स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना प्रत्येकी पाच, तीन व दोन लाख बक्षीस देण्याची घोषणा केली होती. परंतु मागील वर्षी राष्ट्रीय स्पर्धा झाल्या परंतु आजपर्यंत विजेत्यांना या बक्षीसांचे वितरण केले नाही. क्रीडामंत्री व संबंधितांनी अशी संकुचित वृत्ती ठेवून चालणार नाही. आताच्या सरकारचं खेळाकडं दुर्लक्ष आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. खेळांना क्रीडारसीकांनी पाठबळ दिले पाहिजे. कब्बडी, कुस्तीला पाठबळ मिळू लागले आहे.

 येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर विद्यालयाच्या मैदानावर राज्यस्तरीय हौशी व्हॅालीबॅाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती संजय भोसले होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॅा. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, माजी सदस्य विराज काकडे, नीरा बाजार समितीचे सभापती संजय गाडेकर, बारामती तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, रघुनाथ भोसले, इंडियन फेडरेशन ऑफ ड्रॅापबॅालचे अध्यक्ष भास्करराव भागवत, सचिव आर. एस. मानव, पी. बी. माने आदी उपस्थित होते.

पवारसाहेबांनी खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्राला मदत केली. आर्थिक तरतूदी केली. आमच्या सरकारने प्रत्येक जिल्हा, तालुका ठिकाणी क्रीडा संकुल उभे केले. काहींना नोकरी देण्याचे काम केले. स्पर्धांना निधी दिला. महिलांच्या जागतिक विजेत्या संघातील तीन महाराष्ट्रीयन मुलींना एक, एक कोटीची मदत केली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना पाच टक्के आरक्षण दिले. खेळाडूंच्या कौशल्यात, मानसिकतेत आता बदल घडवावेत. पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आताचं सरकार याकडे थेडेसे दुर्लक्ष करते आहे. गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना अद्याप बक्षीसे दिली नाहीत, अशी टीका पवार यांनी केली. तसेच तरूणांनी मोबाईल व टीव्हीपासून दूर रहावे. मोबाईलने कॅन्सर होत असल्याचे संशोधकांनी सिध्द केले आहे. तसेच, भूगाव महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर फिक्सींगची टीका होत आहे. आपण जास्तीत जास्त पारदर्शकता ठेवावी. कुठलीही वशीलेबाजी येऊ देऊ नये, असा सल्लाही पवार यांनी दिला. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे यांनी स्वागत केले. स्पर्धा समन्वयक व 'सोमेश्वर'चे संचालक महेश काकडे यांनी आभार मानले. युवराज शिंदे व आर. बी. नलवडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com