द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आमदार अतुल बेनके यांच्यासोबत बैठक

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आमदार अतुल बेनके यांच्यासोबत बैठक

नारायणगाव : घड निर्मिती न झाल्याने  जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.द्राक्ष बागांची पुनर्स्थापना करण्यासाठी व  कर्ज बाजारी द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने  आर्थिक पॅकेज जाहीर करावे.हवामान आधारित पिक विमा योजना  अस्तित्वात आणावी.निसर्ग चक्री वादळाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची नुकसान भरपाई मिळावी.कर्ज फेडण्याकरिता द्राक्ष उत्पादकांना पुढील पाच वर्षासाठी समान हफ्ते विभागुन द्यावे.अशी मागणी जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आली.

येथील कृषी  विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) सभागृहात आज तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची बैठक आमदार अतुल बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अध्यक्षस्थानी केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर होते.या वेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई,सचिव विकास दरेकर, दयानंद काशीद,जयसिंग वायकर, सतीश नेहरकर,दीपक कोकणे, धनेश वाघ आदी मान्यवर व द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

केव्हीकेचे अध्यक्ष मेहेर म्हणाले, ''हवामान बदलामुळे सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. लॉकडाऊन मूळे मागील हंगामात द्राक्षाचे एकरी तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. जून महिन्यात झालेले चक्री वादळ, त्या नंतर सतत पडणारा पाऊस, ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी, सूर्यप्रकाशाचा अभाव या मुळे या वर्षी सुमारे चार हजार एकर क्षेत्रात अपेक्षित घड निर्मिती झाली नसून वांझ फुट निघाली आहे.या मुळे या वर्षीचा हंगाम वाया गेला आहे. द्राक्ष पिकासाठी शेतकऱ्यांनी  सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँकेकडून पिक कर्ज, मध्य मुदतीची कर्ज घेतली आहेत. मात्र द्राक्ष पिक न आल्याने द्राक्ष उत्पादक कर्जबाजारी झाला असून मार्च अखेर कर्ज हप्ता कसा द्यायचा या आर्थिक विवंचनेत आहेत.

आमदार बेनके म्हणाले, निसर्ग चक्री वादळामूळे झालेल्या द्राक्ष बागांच्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. पीक कर्जावरिल व्याज माफीची मागणी शासनाकडे केली आहे. द्राक्ष उत्पादकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू.

द्राक्ष उत्पादकांच्या मागण्या : कर्जाच्या व्याजात सवलत देवून कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठन करावे, द्राक्ष बागेवर प्लास्टिक आच्छादन करण्यासाठी अनुदान मिळावे. हवामानावर आधारित पिक विमा योजना  अस्तित्वात आणावी. द्राक्ष बागांची पुनर्स्थापना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे. इफको टोकिओ विमा कंपनीकडे थकित असलेली विमा रक्कम मिळावी. निसर्ग चक्री वादळाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांना नुकसान भरपाई मिळावी. खरड छाटणी (एप्रिल) ते फळ छाटणी (आक्टोबर) दरम्यान नैसर्गिक आपतीमुळे होणाऱ्या नुकसानीस पिक संरक्षण मिळावे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com