मंत्री तानाजी सावंतांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले...

TAnaji SAwant
TAnaji SAwant

पुणे ः राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, 150 टक्के पाऊस पडणार, अशी आकडेवारी अधिकारी कागदावर रंगवून मंत्र्यांना चक्क खोटी माहिती देतात. प्रत्यक्षात 30 टक्के किंवा 40 टक्के पाऊस पडतो. त्यातच बॅंकांकडून शेतकऱ्यांना पुरेशे आणि वेळेवर पीक कर्जही मिळत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाऊस नाही, पिकपाणीही नाही. मग शेतकऱ्यांनी काय झक मारायची का, असा सवाल खुद्द राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनीच राज्य सरकारला केला. ... मग शेतकऱ्यांनी झक मारायची का? असा सवाल त्यांनी केल्याने त्यांची जीभ वारंवार घसरत असल्याचे बोलले जात आहे.

खेकड्यांमुळे फुटले तिवरे धरण - तानाजी सावंत

पुण्यातील यशदामध्ये बुधवारी (ता.11) राज्यातील आदर्श गावांना सावंत यांच्या आदर्श गाव पुरस्कारने गौरविण्यात आले. त्यावेळी बोलताना सावंत यांनी हे वक्तव्य केले. मला आकड्यांचा खेळ नको. प्रत्यक्षात काय, हे हवे आहे. यासाठी नियमांच्या चौकटीचे कारण नको. कोणतेही काम हाणून पाडण्यासाठी अधिकारी अनेकदा नियमांची चौकट पुढे करतात. पण ही चौकट 70 वर्षांपुर्वी इंग्रजांनी घालून दिलेली आहे. ती चौकट आता आपण मोडायला हवी, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

खेकड्यांवरून तानाजी सावंतांना उद्धव ठाकरेंनी झापले

सावंत पुढे म्हणाले, "इंग्रज जाऊन 70 वर्षे झाली. तरीसुद्धा आजही त्यांचीच नियमांची चौकट अंमलात आणली जाते. ही चौकट मोडली पाहिजे. लोकांचे हित जोपासणारे निर्णय आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. दरम्यान, सावंत यांनी तिवरे धरण खेकड्यांनीच फोडले असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com