दर वर्षी रामनवमी देशभरात आनंदात साजरी साजरी केली जाते. येत्या ३० तारखेला रामनवमी आहे. या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतं मात्र पुण्यातील शिवाजीनगर, वानवडी या भागात पोलिसांकडून या कार्यक्रमाला परवानगी मिळत नसल्याने राम भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी रामनवमी साजरी करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याचा दावा मनसेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी ट्विट करुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारना केली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "पुण्यात काही ठिकाणी रामनवमी साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासन परवानगी देत नाही मला उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विचारायचं आहे की रामनवमी भारतात साजरी करायची नाही तर मग काय पाकिस्तानात साजरी करायची का?" असा सवालच त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करा असे सांगितले होतं. मात्र पुण्यात पोलिस परवानगी देत नाहीत असा दावा मनसेने केला असल्याने आता पुण्यात रामनवमी होणार का नाही असा प्रश्न राम भक्तांना पडला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.