वैद्यकीय शिक्षण विभागाविरोधात मनविसेची याचिका

वैद्यकीय शिक्षण विभागाविरोधात मनविसेची याचिका

पुणे : राज्यातील खाजगी महाविद्यालय तसेच अभिमत विद्यापीठानी एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे राखीव एन.आरआय कोटीतील प्रवेशप्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लघंन केले आहे. यामुळे राज्यातील सर्व खाजगी महाविद्यालय, अभिमत विद्यापीठ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाविरोधात मनविसेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
 
राज्यातील खाजगी महाविद्यालय अभिमत विद्यापीठ 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये राखीव एनआरआय कोट्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविताना सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच या राखीव जागेतील प्रवेश करावेत, अशी मागणी वैद्यकीय शिक्षण संचालकाकडे मनविसेने केली होती .या मागणीन्वये संचालकांनी सर्व खाजगी महाविदयालय, अभिमत विद्यापीठांना स्पष्ट आदेश देऊन या राखीव 'एनआरआय' जागेतील प्रवेशप्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे म्हणजे विद्यार्थी -पालक एनआरआय असेल तर त्या विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य द्यावे अथवा विद्यार्थ्याचे नातेवाईक एनआरआय असतील आणि हे नातेवाईक या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी ही त्यांच्या एनआरआय बँक खात्यातून देणार असतील तरच अशा विद्यार्थ्यांना या राखीव जागेतील जागेवर प्रवेश द्यावे.  

तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश देताना गुणवत्तेनुसारच प्रवेशप्रक्रिया राबवावी असे स्पष्ट आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८  मधील राखीव जागेतील प्रवेशात विद्यार्थ्यांची संपूर्ण तपशिलांसह माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करावे, असे कळविले होते .मात्र, तरीही राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत भरमसाठ 'कॅपिटेशन फी' (डोनेशन) घेत इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आहे. हे प्रवेश प्रक्रिया पार पाडतेवेळी म्हणजेच समुपदेशन करतेवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकाऱ्यांच्या समक्ष असे गैरप्रकार होत या राखीव एनआरआय जागेचे प्रवेश झाले. याप्रकरणी यादव यांनी वैद्यकिय महाविद्यालय आणि राज्य शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करुन दाद मागितली आहे.

 ''वैद्यकिय महाविद्यालयांनी आर्थिक फायद्यासाठी राखीव एनआरआय कोट्यातून चुकीच्या पध्दतीने प्रवेशप्रक्रिया राबविली आहे. याप्रकरणी वैद्यकिय शिक्षण संचालकांकडे दाद मागूनही उपयोग झाला नाही. या राखीव एनआरआय जागेतील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे उल्लंघन करीत झालेले प्रवेश रद्द करावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या राखीव एनआरआय जागेतील प्रवेश रद्द झाल्यास राज्यातील विद्यार्थ्यांकरीता गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविता येईल. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल."

- कल्पेश यादव, पुणे शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com