पालिका प्रशासनाने पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा

पिसोळीकरांची मागणी : पावसाने ओढ दिल्याने विहिरी-बोअरवेलने गाठला तळ
Municipal administration should solve the water problem immediately
Municipal administration should solve the water problem immediately

उंड्री - पावसाने ओढ दिली आहे, विहिर आणि बोअरवेलने तळ गाठला आहे. पालिकेच्या माध्यमातून ७-८ टँकरद्वारे पाणी विहिरीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याचे नव्याने समाविष्ट झालेल्या पिसोळी (ता. हवेली) येथील नागरिकांनी सांगितले.

ग्रामपंचायत उन्हाळ्यामध्ये विहिरीचे पाणी कमी झाल्यानंतर पाण्याचे टँकर विकत घेऊन विहिरीमध्ये टाकत होती. त्यातून बंदनलिकेद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे पाणी समस्या जाणवत नव्हती. मात्र, गाव पालिकेमध्ये समाविष्ट झाल्यापासून दररोज पाण्याचे सात-आठ टँकर विहिरीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, उन्हाळ्यामध्ये विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्यातच शहरालगतचे गाव असल्याने वाढत्या नागरीकरणामुळे पाणी कमी पडत आहे. पालिका प्रशासनाने पाण्याच्या टँकरची वाढ करून पाणी समस्या सोडवावी, असे ग्रामस्थांनी सांगितले.

पिसोळी गावची अंदाजे १५ हजार लोकवस्ती आहे. पालिकेकडून सात-आठ टँकरद्वारे पाणी विहिरीत टाकून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, येवलेवाडी येथे पाण्याची टाकी झाली आहे. तेथून पिसोळीच्या पश्चिम हद्दीपर्यंत जलवाहिनी टाकली आहे. तेथून तीन किमी जलवाहिनी टाकली, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल.

- स्नेहल दगडे, माजी सरपंच (पिसोळी).

दररोज आठ टँकर विहिरीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जात आहे. गावामध्ये ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत, त्या टाक्यांत टँकरद्वारे पाणी सोडले जाते. सोसायट्यांकडून पाण्याची मागणी होत आहे.

- शांतीलाल कोळेकर, शाखा अभियंता, पालिका पाणीपुरवठा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com