पुण्यात पाणीकपात नाही; महापालिकेकडून स्पष्ट

पुण्यात पाणीकपात नाही; महापालिकेकडून स्पष्ट

पुणे  - खडकवासला धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पुढील तीन महिने पुणेकरांना पुरेल इतके पाणी मिळणार असून, त्यामुळे आता पाणीकपात करण्यात येणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी (ता. 26) स्पष्ट केले. पुणे शहराला येत्या 15 जुलैपर्यंत 5.38 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा राखीव राहणार आहे. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत सध्या 10.7 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातून ग्रामीण भागाला पिण्यासह शेतीला पाणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरासाठी 5.38 टीएमसी पाणी मिळणार आहे. हा पाणीसाठा पुरेसा असून, उन्हाळ्यात पाणीकपात केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. 

सध्या शहरासाठी 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीसाठा घेण्यात येतो. त्यातून विविध भागांत समान पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार महिन्याकाठी 1.4 "टीएमसी' पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे 5.38 "टीएमसी' पाणीसाठा पुरेसा असेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच तूर्तास पाणीकपात केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com