आई-बाबा, मला समजून घ्याल का..?

आई-बाबा, मला समजून घ्याल का..?

पुणे - ‘‘पाल्यांच्या मनात काय आहे? त्यांना काय सांगायचे आहे? आदी बाबी पालकांनी ऐकून समजून घेतल्या पाहिजे. घरातले वातावरण चांगले असेल तर पाल्यांवर  चांगले संस्कार होतात,’’ असे मत कौटुंबिक न्यायालयातील माजी न्यायाधीश अनघा जोशी यांनी व्यक्त केले. 

श्री. विद्याविकास सेवा प्रतिष्ठान संचालित ‘आधार समुपदेशन केंद्र’ आणि ‘फोरसीज काउन्सिलिंग सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल मार्गदर्शन चिकित्सा केंद्र’ आयोजित भित्तिपत्रक प्रदर्शन ‘आई बाबांनो, मला समजून घ्याल का ? विवेकी पालकत्व’ या कार्यशाळेचे उदघाटन माजी न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते झाले. कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक स्मिता जोशी, विवेकी पालकत्व मार्गदर्शक डॉ. सागर पाठक, श्री. विद्याविकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत सुतार, श्रद्धा सरदेशमुख, वासंती काशीद उपस्थित होते. 

जोशी म्हणाल्या, ‘‘आई वडील कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलांना त्यांना बरेच काही सांगायचे असते. पण पालक मोबाईलमध्ये एवढे गुंतलेले असतात, की त्याचे ऐकून घेत नाही. त्यामुळे मूल निराशेकडे जातात. त्यांच्या मनात येते की आई-बाबा आमच्याबरोबर खेळत नाही. मुलांवर रागावल्यास त्यांच्या मनात भीती तयार होते.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com