महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या : राहुल गांधी

Murder of democracy in Maharashtra said Rahul Gandhi
Murder of democracy in Maharashtra said Rahul Gandhi

पुणे : 'महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे'' असे मत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर  व्यक्त केले.  महाराष्ट्रातील सत्तेचा तिढा आणखी गुंतत चालला असताना, आज  महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर राहूल गांधी यांनी प्रथमच भुमिका मांडली आहे.

आज संसदेत राहूल गांधी म्हणाले की, ''मी आज येथे प्रश्न विचारण्यासाठी आलो होतो पण, माझ्या प्रश्न विचारण्याला काही अर्थच नाही कारण, महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता, भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे.  दरम्यान, महाशिवआघाडीचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु असून आज राज्यपालांच्या भेटीसाठी वरिष्ठ नेते राजभवनला दाखल झाले आहेत 
महाविकासआघाडीकडे 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र; राजभवनात सादर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com