राष्ट्रीय पुरस्कारानंतरही बहुली शाळेतील स्वच्छतेची परंपरा कायम

National Award received Bahuli School Cleanness
National Award received Bahuli School Cleanness

खडकवासला : हवेली तालुक्यातील बहुली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला 2016-17 मध्ये "स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालया" केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. परंतू आज देखील या शाळेत आज स्वच्छतेची परंपरा या शाळेत कायम आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) या संस्थेच्या "स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय" या विभागाच्या प्रमुख डॉ. किरण वालिया यांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीदरम्यान शाळा यशस्वी असल्याचे सिद्ध झाले आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने "स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय" अंतर्गत देशात अनेक ठिकाणी याबाबत सर्व्हे सुरू आहे. परंतु महाराष्ट्रात या संदर्भात गेली आणि वर्षापासून काम सुरू आहे. राज्यातील बहुली गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला 2016- 17 साली केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर येथील स्वच्छतेचा हा उपक्रम कसा सुरू आहे. याची पाहणी करण्यासाठी मी आज या ठिकाणी आले होते. या संदर्भात या शाळेसंदर्भात मी अनेक लोकंकडून ऐकले होते. लोकांकडून ऐकलेले आणि त्यासंदर्भात मी पाहणी केली. याठिकाणी स्वच्छतेच्या उपक्रम 'हँडवॉश' म्हणजे हात देण्याची प्रक्रिया मला प्रत्यक्षात पाहायची होती. ती आज मी पाहिली त्यात मुले फार पारंगत आहेत. त्यांना योग्य प्रकारे शिकविले आहे. ती नियमित हात धुण्याची सवय लागल्यामुळे ती सफाईदार हात धूत आहेत. हे मला खूप आवडले. त्याचबरोबर मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह इमारत वेगवेगळी आहे. पटाप्रमाणे स्वच्छतागृहे आहे. स्वच्छतागृह ही दिव्यांग व्यक्तीला देखील सहज  वापरता येतील अशी आहे. स्वच्छ हात धुतले जात असल्याने अनेक आजार होत नाहीत. परिणामी मुलांची शाळेची उपस्थिती जात असते. 

आठवीच्या पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करणार

येथे आठवीपर्यंतचे शिक्षण घेता येते. परंतु त्याच्या पुढील वर्ग याठिकाणी नसल्यामुळे प्रामुख्याने येथील मुली पुढील शिक्षण घेता येत नाहीत. हे ऐकून मला खूप दुःख वाटले. पुढील शिक्षण घेण्यासाठी अंतर दूर असल्याने पालक सुरक्षिततेच्या कारणास्तव पुढील शिक्षणासाठी प्रयत्न करीत नाही. शाळा असलेल्या ठिकाणी शाळेच्या वेळेत जाण्या-येण्यासाठी बस सुविधा नाही. अंतर मोठ्या प्रमाणावर आहे. मोबाईलला रेंज नाही. अशा ठिकाणी या मुलींच्या शिक्षणासाठी सोय केली पाहिजे. या संदर्भात आम्ही नक्कीच या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचे डॉ. वालिया यांनी सांगितले.

पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून याठिकाणी 73 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी प्रशिक्षक प्रभारी मुख्याध्यापक किशोर भवाळकर, मनोज पांचाळ, स्वाती मांजरेकर आणि सुहास जाधव शिक्षक या ठिकाणी अध्यापनाचे काम करत असतात. 

पास झालेल्या मुलींना पुढील शिक्षण घेण्यासाठी सांगरुन व खडकवाडी सुविधा आहे. सांगरूनला जाण्यासाठी थेट बस नाही. मुलगी शाळेतून परत येताना खडकवाडी पर्यंतचे अंतर खूप आहे. बस वेळेवर नाही आली तर अशी पालकांच्या मनात शंका आहे. पालक दररोज ने-आण करू शकत नाही. मुख्याध्यापक किशोर भवाळकर यांनी सांगितले. 

स्वच्छतेच्या उपक्रमाव्यतिरिक्त अनेक सुविधा या शाळेत आहेत. या शाळेतील सर्व ऊर्जा ही सोलर सिस्टिमवर आहे. डिजिटल क्लासरुमचा मुलांसाठी दररोज वापर होतो. ही शाळा दुर्गम दऱ्या खोऱ्यात आणि छोट्याशा जागेत असली तरी मुलांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळत आहे. असे शिक्षण व शैक्षणिक साहित्याचा वापर शहरात देखील होत नाही, असे नवी दिल्ली येथील (एनसीईआरटी) या संस्थेच्या "स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय" या विभागाच्या प्रमुख डॉ. किरण वालिया यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com