अंधारात नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...

Lantern-March
Lantern-March

पुणे - निवडणुकांआधी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्‍न विचारत मते जमविलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारने महाराष्ट्रच अंधारात नेऊन ठेवल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी भारनियमनाविरोधात कंदील मोर्चा काढला. लोकांना अंधारात ठेवणाऱ्या या सरकारच्या कारभारावर ‘प्रकाश’ पाडण्यासाठी हा मोर्चा काढला असून, दिवाळीआधी वीज कपात रद्द न केल्यास मंत्र्यांच्या दारातच ठाण मांडू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार बापू पठारे, रवींद्र माळवदकर, नगरसेवक वनराज आंदेकर, प्रदीप गायकवाड, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, नितीन कदम आदींसह पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. महागाई, इंधन दरवाढीपाठोपाठ वीज कपात करण्यात आल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी भाजप-शिवसेना सरकारविरोधात घोषणाबाजी केली. नाना पेठेतील संत कबीर चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप रस्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर करण्यात आला आहे.

भाजप नेत्यांनी लोकांना खोटी आश्‍वासने देऊन सत्ता मिळविली. त्यानंतर लोकांच्या फसवणुकीचा सपाटा लावला आहे. ठराविक घटकांच्या तुंबड्या भरण्यासाठी सरकार सामान्यांवर मात्र महागाई लादत आहे. आपली धोरणे रेटताना सरकार निवडणुकांसाठी पैसा जमवत आहे. आधी वीजदरात वाढ केली आणि आता विजेची कपातही सुरू केली आहे. त्यामुळे लोकांनी सण साजरे करायचे तरी कसे? 
- चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com