भटक्‍या विमुक्‍तांसाठी धोरण करावे - डॉ. थोरात

Sulhdev-Thorat
Sulhdev-Thorat

पुणे - संविधानात समता, बंधुता ही मूल्ये असली तरी ती समाज-व्यवस्थेमध्ये नाहीत. त्यामुळे भटके विमुक्त अद्यापही गावकुसाबाहेर आहेत. त्यांना कायमचा निवारा आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने ते विकासापासून दूर आहेत. शासनाने त्यांच्या विकासासाठी धोरण तयार करणे आवश्‍यक आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. 

निर्माण संस्था व एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे गुन्हेगारी कलंकाला मूठमाती अभियानांतर्गत ‘भटके विमुक्त जमाती : अन्याय अत्याचार व वंचित’ या विषयावर डॉ. सुखदेव थोरात बोलत होते. प्रा. सुभाष वारे, वैशाली भांडवलकर या वेळी उपस्थित होत्या.  

थोरात म्हणाले, ‘‘गुन्हेगारीच्या कलंकामुळे गावांमध्ये शेती, व्यवसाय, शिक्षणात भटक्‍या विमुक्तांशी भेदभाव केला जातो. त्यामुळे त्यांची आर्थिक, शैक्षणिक स्थिती चांगली नाही. अनेकांना पूर्वाश्रमीचे गुन्हेगार या शिक्‍क्‍यामुळे गुन्हा न करताही तुरुंगामध्ये जावे लागले. जी संस्कृती सर्वांना सामावून घेऊ शकत नाही, प्रेम करू शकत नाही ती कसली संस्कृती? गावात अजूनही अस्पृश्‍यता, द्वेष आहे. उच्च जातीतील व्यक्तीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तरी त्यालाही समाजातून बाहेर काढले जाते. संविधानात समता, बंधूतेचे मूल्य असेल तरी जातिव्यवस्थेमुळे ही मूल्ये समाजात मुरलेली नाहीत.

आईवडिलांना मराठी येत नसताना आता ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. त्याचा फटका भटके, विमुक्त, दलितांना सर्वांत जास्त बसला.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com