पोषण आहाराची ताटे गेली कुठे?

Nutrition-Food
Nutrition-Food

पिंपरी - विद्यार्थ्यांना दुपारी शाळेत पोषक आहार मिळावा, या हेतूने केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. त्याअंतर्गत सरकारने मुलांना जेवणासाठी स्टीलचे ताट, वाटी व ग्लास पुरवले. परंतु, ते धुणार कोण? त्यामुळे डब्यातच आहार दिला जातो. मात्र, शाळांना पुरविलेली ताट, वाट्या गेली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे मुख्याध्यापकही दुर्लक्ष करत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत उघडकीस झाले आहे.

महापालिका आणि अनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक ४४२ शाळांमध्ये केंद्र सरकारकडून शालेय पोषण आहार पुरविला जातो. त्यासाठी मुलांना ताट आणि वाट्या किंवा डबा (टिफीन) घरूनच आणायला सांगत. त्यामुळे ही योजना सुरवातीपासूनच चर्चेचा विषय ठरली. वह्या, पुस्तकांचे ओझे, त्यातच ताट-वाटी यामुळे दप्तरे फाटत होती. त्यामुळे मुलांनी घरून आणलेल्या डब्यातच खिचडी खायला सुरवात केली. 

तो छोटा असल्याने आवारातच सगळीकडे भात पडलेला असायचा, तुडवला जायचा. हे चित्र बदलण्यासाठी मनसेचे शहर सचिव रूपेश पटेकर यांनी २०१५ मध्ये मुलांना ताट, वाटीतच खिचडी वाटप करण्याची मागणी केली. त्यावर शिक्षण विभागाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी सत्यवान सोनवणे व शालेय पोषण आहार विभागाने जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. त्यानंतर जिल्हा परिषदेकडून महापालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये खिचडीसाठी ताट, वाट्या पुरविल्या. परंतु, गेल्या पाच वर्षांपासून अजूनही विद्यार्थ्यांना जेवणासाठी डबे आणावे लागत आहेत.

बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ताट आणि वाटी पुरवली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताटातच जेवण केले पाहिजे. तशा सूचना मुख्याध्यापकांना करण्यात येतील.
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com