समान पाणीवाटप योजना खुरडतच;आतापर्यंत एक टक्केच काम

समान पाणीवाटप योजना खुरडतच;आतापर्यंत एक टक्केच काम

पुणे - जलवाहिन्यांच्या खोदाईचे काम 1 टक्के. म्हणजे, एकूण पावणेदोन हजार किलोमीटरच्या वाहिन्यांपैकी 300 किलोमीटरची कामे. पाण्याच्या साठवण टाक्‍या 3 टक्के, अर्थात, 28-30 टाक्‍यांची बांधणी आणि पाण्याचे मीटर; तर 8 टक्केच. पुणेकरांना शुध्द आणि मोजूनमापून पाणी देण्यासाठी आखलेली तब्बल सव्वादोन हजार कोटी रूपयांच्या समान पाणी योजनेची ही सद्य:स्थिती! योजनेला मंजुरी मिळून अडीच वर्ष होऊनही ती पुढे सरकली नसल्याचे प्रत्यक्षातील कामांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

समान पाणीवाटपाच्या पहिल्या टप्प्यांत आजघडीला सगळ्या म्हणजे, 82 टाक्‍या आणि सातशे किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांची कामे अपेक्षित होती. त्यांच्या निम्मीही कामे झाली नसतानाही महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी ठेकेदार कंपन्यांनी जाबही विचारला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे योजनेला गती कधी मिळणार, ती पूर्ण कधी होईल आणि पुणेकरांना पुरेसे पाणी कधी मिळेल, हे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यापासून खासदार गिरीष बापट आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगता आले नाही. या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने खासदार बापट यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बापट म्हणाले, ""पुणेकरांसाठी जाहीर केलेल्या बहुताशी योजनांची कामे सुरू झाली आहेत. कोरोनामुळे त्यांच्या अंमलबजाणीचा वेग कमी झाला होता. परंतु, कोरोना कमी झाल्याने कामे पुन्हा सुरू करीत आहोत. विशेषत: समान पाणीपुरवठा योजनेतील सर्व कामे वेगाने करू.'' 

अडथळे दूर करणार 
समान पाणीपुरवठा योजनेतील खोदाईच्या कामात अडथळे आणून, महापालिकेतील काही नगरसेवकांशी ठेकेदार कंपन्यांकडे पैशांची मागणी केल्याच्या तक्रारी आहेत. यावर बापट म्हणाले, "पुणेकरांना पाणीपुरवठा करण्याच्या योजनेत कोणी अडचणी आणत असेल तर त्यांची गय येली जाणार नाही. ज्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर होण्याची आशा आहे.' 

बेजबाबदार कंपन्यांवर कारवाई 
योजनेच्या कामात ठेकेदार कंपन्यांची दिरंगाई होत असल्याचे सांगत, अशा कंपन्याची कामे काढून घेण्याचा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वर्षभरापूर्वी दिला होता. त्याकडे लक्ष वेधत, बेजबाबदार कंपन्यांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा मोहोळ म्हणाले, "ज्या कंपन्या ठराविक काळात आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, त्यांच्यावरील कारवाई निश्‍चित असेल. त्यामुळे कामे वेळेत होतील.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com