फक्त न्यायालयांवर विश्‍वास उरला... - पालकमंत्री बापट

राजगुरुनगर (ता. खेड) - राजगुरुनगर वकील बार असोसिएशन सदस्यांशी संवाद साधताना पालकमंत्री गिरीश बापट.
राजगुरुनगर (ता. खेड) - राजगुरुनगर वकील बार असोसिएशन सदस्यांशी संवाद साधताना पालकमंत्री गिरीश बापट.

राजगुरुनगर - ‘लोकांचा राजकारण्यांवरचा आणि पोलिसांवरचा विश्‍वास उडाला असून, फक्त न्यायालयांवर विश्‍वास उरला आहे,’’ असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केले. 

राजगुरुनगर येथे विविध कार्यक्रमांसाठी आले असता, त्यांनी राजगुरुनगर वकील बार असोसिएशनला भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, गणेश सांडभोर, अजय चव्हाण आणि बारचे अध्यक्ष दिलीप करंडे, उपाध्यक्ष वैभव कर्वे, संदीप भोसले, चंद्रकांत सांडभोर, अनिल राक्षे, रामचंद्र घोलप, पोपटराव तांबे, महावीर पारख, किरण झिंजुरके, बाळासाहेब लिंभोरे, अतुल ठाकूर आदी वकील उपस्थित होते. 

ते म्हणाले, ‘‘न्यायदेवता न्याय देते, अशी लोकांची खात्री असते. त्यामुळे त्यांना आधार वाटतो. वकील आपल्याला न्यायदेवतेकडून न्याय मिळवून देईल, अशी त्याला अशा असते आणि वकिलांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला पाहिजे. माझ्याकडे आलेले प्रश्न मी सोडवितो, जिल्ह्यातील वकिलांचे आणि न्यायालयांचे प्रश्न मी सोडवीन.’’

राजगुरुनगरला औद्योगिक न्यायालय व्हावे, कारागृह करावे, न्यायाधीश निवासांसाठी जागा हस्तांतरीत करावी, अशा मागण्या या वेळी अध्यक्ष करंडे यांनी केल्या. प्रदीप उमाप यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com