पुणे : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत २५ टक्के राखीव जागांवर रोहितलाही (नाव बदललेले आहे) प्रवेश मिळावा, म्हणून त्याच्या पालकांनी ऑनलाइन अर्ज केला. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत जाहीर झालेल्या सोडतीत रोहितचे नाव लागले नाही. त्याच्या अर्जासमोर आपले नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट असल्याचा संदेश येत आहे. मात्र आता ऑनलाइन शाळा सुरू होऊनही तीन महिने उलटले, तरी रोहित आणि त्याच्यासारखे हजारो विद्यार्थी शाळा प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आरटीई २५ टक्के आरक्षित जागांवर वेळेत प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सप्टेंबर महिना संपत आला, तरी प्रवेश निश्चित होऊ शकलेला नाही. अन्य विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइनद्वारे सुरू झाले. पण माझ्या मुलाचा अद्याप शाळा प्रवेशही झालेला नाही. परिणामी मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावू लागली आहे, अशी कैफियत रोहित याचे वडील यांनी नाव घेण्याच्या अटीवरुन मांडली.
आरटीई २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी १७ मार्चला पहिली सोडत काढण्यात आली. त्यात राज्यातील एक लाख १५ हजार ४६० जागांसाठी सुमारे एक लाख ९२६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाला. परिणामी या प्रवेश प्रक्रिया काही महिन्यांसाठी स्थगिती करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला पहिल्या सोडतीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत दिली होती. त्यानंतर प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आताही मुदती देखील संपली असून अद्याप प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सूचना न आल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सातत्याने पाठपुरावा करूनही शिक्षण विभागाकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने पालक या प्रवेश प्रक्रियेबद्दल असंतोष व्यक्त करत आहेत. या प्रवेशासंदर्भात असलेल्या पोर्टलवर 'प्रतीक्षा यादीतील पालकांनी बालकांच्या प्रवेशासाठी सध्या शाळेत जाऊ नये. त्यांच्याकरिता स्वतंत्र सूचना आरटीई पोर्टलवर देण्यात येईल.' अशी माहिती गेल्या सहा महिन्यापासून दिली जात आहे. याबद्दल प्राथमिक शिक्षण विभागाचे सहसंचालक दिनकर टेमकर यांना विचारले असता, प्रतीक्षा यादीतील प्रवेशाकरिता सप्टेंबर अखेरपर्यंत पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
प्रवेशासाठी शाळांवर हवा दबाव
"आरटीई २५ टक्के राखीव जागांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीत नावे असणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहेत. आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश तातडीने सुरू करावेत. हे प्रवेश विनाअडथळा व्हावेत, यासाठी प्रशासनाने शाळांवर दबाव टाकावा."
- शरद जावडेकर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा
पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.