पुणे : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी पालखीत सहभागी झाली आहे. राज्यभरातून आलेले जवळपास 100 मुले आणि त्यांची आई दिंडीत आहेत. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम ही संस्था या मुलांचा सांभाळ असून त्यांच्या माध्यमातून ही दिंडी काढण्यात आली आहे.
''कर्जाच्या डोंगरामुळे त्रासून आत्महत्या करू नका, बळीराजाच्या लेकरांनो हिंसक मार्गाने आत्महत्या करू नका, आमच्या बापाने आत्महत्या केल्यामुळे आमच्या जीवनात अंधार झाला'', असा संदेश या मुलांनी दिंडीद्वारे दिला.
संस्थेत सध्या 600 मुले असून त्यातील शंभर मुले पालखीत सहभागी झाले आहेत. राज्यातील सुमारे अठराशे मुलं संस्थेच्या वेटिंग लिस्टवर आहेत. राज्य सरकार म्हणते की, ''या मुलांचा देखील संस्थेत सहभाग करून घ्या. मुळात या मुलांचा प्रश्न मिटविण्यापेक्षा सरकारने शेतकरी आत्महत्या करणार नाही याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे, अशी भावना संस्थेचे रेवजी वाळुंज यांनी व्यक्त केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.