पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

water-supply
water-supply

पिंपरी - शहरात तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, यापुढेही कायम राहणार आहे. समाविष्ट गावे, वाढते नागरीकरण, लोकसंख्या लक्षात घेता पाणी प्रश्‍न गंभीर झाला आहे. रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी बाधित शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तत्काळ कामे मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पवना धरणात मुबलक पाणीसाठा असूनही पाणी मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत, असे नमूद करून चिंचवडे यांनी पत्रात म्हटले आहे की, पवना जलवाहिनीचे काम नऊ वर्षांपासून बंद आहे. भामा-आसखेड, आंद्रा धरणातील पाणी आरक्षणास सरकारने मान्यता दिली आहे; मात्र कामे प्रलंबित आहेत. चोवीस तास पाणीपुरवठा योजना अकार्यक्षम ठेकेदारांमुळे अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत. शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची बैठक घ्यावी. निर्धारित कालावधीतच कामे पूर्ण करण्याचे आदेश पालिकेला द्यावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com