शेतकऱ्यांनो सावधान, व्यापारी करतात अशी फसवणूक...

farmer1
farmer1

माळेगाव (पुणे) : काटेवाडी (ता. बारामती) येथील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांनी संगनमत करून सुमारे सव्वापाच लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी शेतकरी रणजित ज्ञानदेव दळवी (वय 37) यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांच्या तीन एकर क्षेत्रातील 12 टन डाळिंब अण्णासाहेब किसन खोपडे, राहुल तुकाराम काळे (दोघे रा. सणसर, ता. इंदापूर), अस्लम हुसेन शेख (रा. कल्याण, खडक पाडा, सदानंद चौक, काळा तलावाशेजारील, मुंबई) यांनी 2 सप्टेंबर 2019 रोजी 48 रुपये प्रति किलो दराने विकत घेतले. त्यांची एकूण किंमत पाच लाख 76 हजार इतकी झाली. ठरलेल्या व्यवहारानुसार व्यापाऱ्यांनी पन्नास हजार रुपये रोख ऍडव्हान्स स्वरूपात दिले व बाकी पाच लाख 26 हजार रुपये आजपर्यंत वेळोवेळी मागणी करूनही दिले नाहीत. 

या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित तीन आरोपींवर आर्थिक फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार ओमासे हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com