सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

voting
voting

पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने राज्यातील निवडणुकीस पात्र असलेल्या सुमारे वीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा आदेश राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी काढला आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम तरतुदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर आहे. मार्च महिन्यात काही सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्यातील अ, ब, क आणि ड या सर्व वर्गवारीमधील सहकारी संस्थांच्या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या निवडणुका ३१ मे नंतरच घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १० मार्च रोजी लागू झाली आहे. त्यानंतर एक महिन्याने शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याने आश्‍चर्य होत आहे. याबाबतचा आदेश लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच काढणे आवश्‍यक होते. मात्र, हा निर्णय घेण्यास शासनाने का उशीर लावला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com