वेळेवर लग्न लावण्यासाठी जनजागृती मोहीम

pune.jpg
pune.jpg

वाघोली : वेळेपेक्षा तास दोन तास उशिरा लागणारी लग्न, भाषणबाजी, सत्कार यासाठी जाणारा वेळ, त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी, या सर्व बाबीवर होणार अफाट खर्च. हे कुठे तरी थांबले जावे लग्न वेळेवर लागली जावीत व खर्चात बचत व्हावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ चंद्रकांत कोलते यांनी जंनजागृती मोहीम उभारली आहे. गावागावात जाऊन ते याबाबत जनजागृती करून आवाहन करीत आहेत. त्याला प्रतिसाद मिळत असून लग्न सध्या पद्धतीने लावले जात आहे.

डॉ कोलते यांनाही अनेक लग्नात जावे लागते. त्यासाठी होणारा अफाट खर्च व वाया जाणारा वेळ पाहून हे कुठे तरी थांबले पाहिजे असे त्यांना वाटले. आपणच जनजागृती करू असा विचार करून त्यांनी  समविचारी लोकांना बरोबर घेऊन जनजागृती मोहीम सुरू केली. गावात जाऊन बैठका घ्यायच्या व जनजागृती करायची अशी त्यांची चळवळ सध्या सुरू आहे. याबाबतची पत्रकेही त्यांनी तयार केली आहे. नागरिकांनाही या बाबी पटू लागल्याने साध्या पद्धतीने व कमी खर्चात लग्न, साखरपुडा व कार्यक्रम होऊ लागले आहेत. त्यांच्या या चळवळीत अनेक जण सहभागी होत आहेत. याबाबतची एक कविताही त्यांनी तयार केली आहे.

 या मोहिमेला प्रतिसाद देऊन आपली लग्न वेळेवर व साध्या पद्धतीने लावणारे बाळासाहेब कंद, रामभाऊ कंद, उपअधीक्षक सुदाम राखपसरे पाटील, रोनी सातव, नंदकुमार तांबे यांचा पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वाल्मिक भोरडे, उत्तम भोंडवे, डी एम झुरूगे, तुकाराम जाधव, कुशाभाऊ गावडे, शहाजी आव्हाळे उपस्थित होते.

 लग्न वेळेवर लागण्यासाठी काय करावे  

1) वराला दर्शनाची व्यवस्था कार्यालयातच असावी.
2 ) वधुला वेळेवर गेटवर आणावे.
3) औक्षण करणार्यांनी गेटवर वेळेवर हजर असावे.
4) वर वधुला लग्नाच्या वेळेच्या अगोदर विवाह मंचावर आणावे.
5) पाहुण्यांचा सत्कार, मानपान लग्नाच्या वेळे पूर्वीच करावा.
6) विवाह.मंचावर गर्दी करुन नये.
7) आशिर्वाद पर भाषणे मुहूर्त टाळून नको.
8)  फटाके किवा इतर आतिषबाजीचा अतिरेक टाळावा.
9) फोटोग्राफरचा अनावश्यक वेळ टाळावा. 
 वेळेवर लग्न लागल्यास आपला व कार्यक्रमास येणाऱ्यांचा आनंद द्विगुणीत होईल.

जनजागृती मोहिमेची कविता 

लग्नाचा कार्यक्रम वेळेवर करु,
समतेचा विचार अंगीकारु,
चारीत्र्यवान आसल बरा,
त्याचाच आशिर्वाद खरा.
मानपान आधीच द्यावे,
नात्याचे वडीलधारे तेथे असावे.
अन्नाच्या नासाडीची सल बोचते मनाला,
कुपोषनाने ही मृत्यु येतो अनेक बालकाला.
आम्ही इतरापेक्षा वेगळे आहोत अशी समज नसावी,
बोलणान्याने स्वतापासून सुरुवात करावी,
जातीधर्मापेक्षा आचरणाने आणि कतुत्वाने माणसे समजावी.
लहान मोठी झगमग राहण्याची अन बेगड्या श्रीमंतीची प्रौढी खोटी,
न्यायाची नितीची बाजु धरुन बोलू आता.
कारण आपला आदर्श आहे तुकोबाची गाथा.      
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com