प्रवाशांना वेठिस धरण्यापेक्षा सरकारने खासगी बस सुरू करावी

खासगी प्रवासी बस ताब्यात घेऊन त्याद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघटेनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
ST
STSakal

पुणे ः एसटी महामंडळचे कर्मचारी आणि राज्य सरकारच्या वादात प्रवाशांना वेठीस धरू नका. त्यांच्यासाठी खासगी प्रवासी बस ताब्यात घेऊन त्याद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी राज्य माल व प्रवासी वाहतूकदार संघटेनेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी केली. प्रवासी वाहतुकीसाठी राज्यात २५ हजारपेक्षा जास्त खासगी बस उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा राज्य सरकराने तातडीने सहानुभूतीने विचार करावा, असे आवाहनही संघटनेने राज्य सरकारला केले आहे.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. अनेकांना कामावर परतण्यासाठीही अडचणी होत आहेत तर, अनेकजण गावांकडे अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा राज्य सरकारने विचार करावा. परंतु, प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. कर्मचारी आणि राज्य सरकारच्या वादात प्रवाशांना वेठीस धरण्याचे कारण काय ? प्रवासी पैसे देऊन वाहतुकीची सुविधा वापरतात. त्यामुळे त्यांनाही न्याय दिला पाहिजे. राज्यात १० हजारपेक्षा जास्त खासगी प्रवासी बस आहेत. तसेच विद्यार्थी वाहतूक, कामगार वाहतूक आणि पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या बस सध्या पडून आहेत. त्या बस राज्य सरकारने अधिग्रहीत कराव्यात आणि प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा मिळेल. तसेच एसटीच्या दरात प्रवासी वाहतूक करण्यास या बसचालकांना बंधकारकरक करता येईल.’

ST
शासनाचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांना अमान्य; संप सुरुच राहणार!

राज्य सरकारने या पूर्वी ५ - ६ वेळा खासगी बस अधिग्रहीत करून त्यांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा असा निर्णय घ्यावा. प्रवाशांची गैरसोय टाळणे गरजेचे आहे. नागरिक गावांकडेच अडकले तर, त्यामुळे शहरांतील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. त्यातून सुरू झालेल्या अर्थचक्राला खीळ बसेल, अशी भीतीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com